Vishwajit Rane  Dainik Gomantak
गोवा

महिलांसाठी सरकारच्‍या विविध योजना : विश्‍‍वजीत राणे

मडगावात ‘महिला सशक्तीकरण’ अभियान

दैनिक गोमन्तक

सासष्टी : सरकारच्या सर्व योजना घरोघरी पोहोचाव्यात यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे. प्रत्येक कुटुंबाला दोन ते तीन योजनांचा लाभ मिळावा याकडेही लक्ष देणे गरजेचे आहे. महिलांसाठी अनेक योजना असून, त्‍यांचा त्‍यांनी लाभ घ्‍यावा, असे आवाहन महिला व बालकल्याण मंत्री विश्र्वजीत राणे यांनी सांगितले.

मडगावात भाजप महिला मोर्चातर्फे शनिवारी आयोजित महिला सशक्तीकरण अभियान संमेलनात राणे प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. याप्रसंगी आमदार उल्हास तुयेकर, माजी उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर, पक्षाचे सरचिटणीस नरेंद्र सावईकर, माजी आमदार दामू नाईक, महिला मोर्चाच्या राज्य अध्यक्षा आरती बांदोडकर यांचीही उपस्‍थिती होती. त्‍यांनी सरकारच्या महिलासाठींच्या अनेक योजनांची माहिती दिली. हे संमेलन सासष्‍टी तालुक्यातील महिलांसाठी आयोजित करण्यात आले होते.

मोदी दूरदृष्टीचे नेते

भाजप हा समाजाच्या तळागळात जाऊन काम करतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दूरदृष्टीचे व महिलांच्या विकासाला चालना देणारे नेते आहेत. त्यांच्यामुळेच महिला व बालकल्याण तसेच आरोग्य खात्यामार्फत महिलांसाठी अनेक योजना सुरू करण्यात आल्याची माहिती राणे यांनी दिली. दरम्‍यान, याप्रसंगी उल्लेखनीय कामगिरी केलेल्या महिलांचा तसेच महिला बचत गटांचा सत्कार करण्यात आला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

PM Modi Goa Speech: "आयुष्याच्या प्रत्येक वळणावर गोव्याच्या भूमीने मला दिशा दिली", PM मोदी असं का म्हणाले? Watch Video

Goa Accident: मुळगावात दुचाकींची समोरासमोर धडक, दोन तरुणांचा मृत्यू; अपघाताची पोलिसांकडून चौकशी सुरु

''गोव्याने केवळ संस्कृतीच जपली नाहीतर...'', गोकर्ण पर्तगाळी मठाच्या योगदानाचे कौतुक करताना PM मोदींनी काढले गौरोद्गार VIDEO

India GDP Growth: भारताची अर्थव्यवस्था सुस्साट! दुसऱ्या तिमाहीत GDP वाढ 8.2 टक्क्यांनी मजबूत, आर्थिक विश्लेषकांचे चुकले अंदाज

सात राजवंशांनी राज्य केलं, पण संस्कृती टिकली! गोव्याचा ऐतिहासिक वारसा जपण्यासाठी मठांचं कार्य महत्त्वाचं; CM सावंतांचं प्रतिपादन

SCROLL FOR NEXT