Goa News | Ulhas Tuyekar Dainik Gomantak
गोवा

Kadamba Bus: प्रवाशांची गैरसोय ओळखत 'कदंब'ने घेतला 'हा' निर्णय; अध्यक्ष तुयेकर म्हणाले लवकरच....

''दर ठरल्यानंतर पुढील निर्णय घेणार ''

दैनिक गोमन्तक डिजिटल

वेळेवर सार्वजनिक वाहतूकीसाठी कदंब बसची संख्या कमी असल्याने समस्यांना सामोर जावे लागत असल्याची तक्रार नागरीकात आहे. यावर कदंब महामंडळाने मार्ग काढला असून, प्रवाशांची समस्यांतून सुटका होण्यासाठी खासगी बस भाडेतत्त्वावर घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अशी माहिती आज कदंब महामंडळाचे अध्यक्ष उल्हास तुयेकर यांनी दिली आहे.

(Ulhas Tuenkar informed that the Kadamba Corporation will take private buses on lease)

मिळालेल्या माहितीनुसार गेल्या काही दिवसांपासून कदंब बसची संख्या वाढवाव्या अशी मागणी नागरीकांतून होत आहे. वेळेत बस नसतील तर घरातून बाहेर पडलेल्या कामासाठी वेळ न जाता तो प्रवासात अधिक जातो अशी खंत काही प्रवाशांनी व्यक्त केली होती. यावर कदंब महामंडळाने पर्याय शोधला असून कदंब महामंडळ खासगी बस देखील चालवायला घेणार असल्याने बसची संख्या वाढण्यास मदत होणार आहे.

खासगी बस कदंब महामंडळ चालवायला घेणार असल्याची माहिती देताना कदंब महामंडळाचे अध्यक्ष उल्हास तुयेकर म्हणाले की, आतापर्यंत 140 खासगी बस मालकांकडून प्रतिसाद आला आहे. मात्र दराबाबत अधिक चर्चा होऊ शकलेली नाही. त्यामुळे दर ठरल्यानंतर याबाबतचा निर्णय घेतला जाईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Bomb Threat: मोठी बातमी! पणजीतील पासपोर्ट भवन बॉम्बने उडवून देण्याची धमकी; प्रशासनाची धावपळ अन् परिसरात भीतीचे वातावरण

भिजत पडलेलं युतीचं घोंगडं कधी सुकणार? जनतेला हवाय 'सक्षम पर्याय'; विरोधकांनो स्ट्रॅटजी बदला!

IND vs WI: "वर्ल्ड कपमध्ये असल्या तमाशांची काय गरज?" ईडन गार्डन्सवरील हाय-व्होल्टेज सामन्यातील 'लेझर शो'वर भडकले शास्त्री-गावस्कर

इराक, व्हेनेझुएला आणि आता इराण... अमेरिकेच्या 'हिटलिस्ट'वरचा पुढचा नंबर कोणाचा?- संपादकीय

सां जुझे आरियल ग्रामसभेत आरोप-प्रत्यारोप; सप्टेंबरनंतर एकही ग्रामसभा घेतली नसल्याने ग्रामस्थांनी सरपंचांना घेरले

SCROLL FOR NEXT