Goa Marathi Academy Dainik Gomantak
गोवा

गोवा मराठी अकादमीतर्फे स्त्रीसंगम 'वंदे मातरम' संमेलन

ललित लेखिका रश्मी कशेळकर यांच्या हस्ते संमेलनाचे उद्‍घाटन

दैनिक गोमन्तक

पणजी: गोवा मराठी अकादमीतर्फे 27 रोजी येथील इन्स्टिट्यूट मिनेझिस ब्रागांझा सभागृहात सकाळी 9 ते संध्याकाळी 5 पर्यंत स्त्रीसंगम वंदेमातरम हे महिला मराठी संमेलन होणार आहे. ललित लेखिका रश्मी कशेळकर यांच्या हस्ते संमेलनाचे उद्‍घाटन होईल. उद्‍घाटन सत्राला अकादमीचे अध्यक्ष प्राचार्य अनिल सामंत, पौर्णिमा केरकर, मंदार नाईक उपस्थिती राहतील. दुसऱ्या सत्रात वेगळ्या वाटा या विषयावर परिसंवाद होईल. यात सुमंत सामंत (समाज-शिक्षण) व रश्मी कशेळकर (साहित्य) यांचा सहभाग असेल.

गीता गवस त्यांच्याशी संवाद साधतील. तिसऱ्या सत्रात दुपारी 12.15 वा.मीना समुद्र यांच्या अध्यक्षतेखाली कवि संमेलन होईल. यांत अंजली आमोणकर, स्वप्ना धुपकर, डॉ. नीता तोरणे, केतकी साळकर, डॉ. सुनेत्रा कळंगुटकर, शांभवी देशपांडे, श्रध्दा गवंडी, अंतरा भिडे, गौरी कुलकर्णी, दीपा मिरिंगकर, अंजली चितळे, रजनी रायकर, शर्मिला प्रभू, पौर्णिमा देसाई, तृप्ती बांदेकर, आसावरी कुलकर्णी, विद्या घैसास, सरोजिनी गावकर, कालिका बापट, डॉ. आरती दिनकर व चित्रा क्षीरसागर यांचा सहभाग असेल. दुपारच्या सत्रात 2.30 वा. स्मरूनी गोमंतदेवी हा गीत-संगीत-काव्य-नृत्य- नाट्य-पोवाडे असा विविधरंगी आविष्कार असलेला सांस्कृतिक कार्यक्रम होईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

शनि आणि गुरुची चाल करणार मालामाल! नव्या वर्षात खुले होणार उत्पन्नाचे नवे मार्ग, 2026 मध्ये 'या' राशींना मिळणार धनकमाईच्या सुवर्णसंधी

Bodgeshwar Jatra: म्हापशात प्रशासनाचा बडगा! श्री बोडगेश्वर जत्रोत्सवातील जायंट व्हील्ससह 20 राईड्स सील; सुरक्षेच्या कारणास्तव मोठी कारवाई

पिढ्यांमधील अंतर आणि मनाचा समतोल: सुखी म्हातारपणाची गुरुकिल्ली

लग्नाच्या मांडवात राडा! नवऱ्या मुलाला किस करणाऱ्या 'एक्स'ला नवरीनं भर मंडपात धोपटलं; सोशल मीडियावर व्हिडिओ तुफान व्हायरल

India Pakistan Nuclear List: तणावाच्या वातावरणातही भारत-पाकिस्तानने जपली 35 वर्षांची परंपरा; अणुयादीच्या देवाणघेवाणीने जगाचे वेधले लक्ष

SCROLL FOR NEXT