डिचोली: शिरगावच्या श्री लईराई देवीच्या जत्रेतील आर्थिक उलाढालीवर परिणाम झाला असून व्यावसायिकांना फटका बसल्याचा अंदाज आहे. यंदा आर्थिक उलाढालीवर ३० ते ३५ टक्के परिणाम झाल्याची माहिती काही विक्रेत्यांनी दिली आहे. जत्रेत झालेल्या चेंगराचेंगरीमुळे आर्थिक कमाईवर परिणाम झाला, असे एक रस विक्रेता शहाजी पाटील यांनी सांगितले.
‘कोविड’ महामारी काळ सोडल्यास खाणबंदीनंतर आणि वाढत्या महागाईचा आतापर्यंत जत्रेच्या आर्थिक उलाढालीवर कोणताही परिणाम झाल्याचे जाणवत नाही. उलट दरवर्षी आर्थिक उलाढाल वाढत असते.
सध्याच्या घडीस या जत्राकाळात होणारी आर्थिक उलाढाल एक कोटीच्या घरात पोचत आहे. जत्रा ते कौलोत्सव मिळून किमान पाच दिवस धंदा तेजीत चालत असतो. यंदा मात्र स्टॉल लवकर काढावे लागल्याने व्यावसायिकांच्या धंद्यावर परिणाम होताना आर्थिक कमाईही कमी झाली.
शिरगावातील जत्रोत्सवाची सांगता झाली असली तरी झालेल्या चेंगराचेंगरीची भयानकता अजूनही अनेकांच्या डोळ्यांसमोर तरळत आहे. जत्रा आणि कौलोत्सवाला यायला मिळाले नाही, ते भाविक आता शिरगावात येत आहेत. आजही गोव्याबाहेरील काही भाविक देवीच्या दर्शनासाठी आले होते. मात्र सर्वत्र चर्चा अजूनही दुर्घटेबाबतच सुरू आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.