Shirgao Agriculture Dainik Gomantak
गोवा

Shirgao: बळीराजा संकटात! शिरगावात भातशेती पाण्याखाली; पावसाच्या तडाख्याने रोपे मातीमोल

Shirgao Agriculture: गेले चार-पाच दिवस धुमाकूळ घातलेल्या पावसाच्या तडाख्यात शिरगावमधील भातशेती पूर्णपणे पाण्याखाली गेली आहे. पावसाने शेतीत पाणी साचून राहिले आहे.

Sameer Panditrao

डिचोली: पावसाच्या तडाख्यात शिरगावमधील भातशेतीची धूप झाली असून भाताची रोपे मातीमोल झाली आहेत. गेले चार-पाच दिवस धुमाकूळ घातलेल्या पावसाच्या तडाख्यात शिरगावमधील भातशेती पूर्णपणे पाण्याखाली गेली आहे.

पावसाने शेतीत पाणी साचून राहिले आहे. त्यामुळे भाताची रोपे कुजली असून बळीराजा पुरता संकटात आला आहे.

आधीच खनिज व्यवसायामुळे शिरगावमधील शेतीवर परिणाम झाला आहे. बहुतांश शेतजमीन नापीक बनली आहे. त्यातच गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही पावसाने तडाखा दिल्याने कपाळावर हात मारून घेण्याची वेळ शिरगावमधील बळीराजावर आली आहे.

गेल्यावर्षीही अतिवृष्टीमुळे शेती पाण्याखाली आली होती. पावसाच्या पाण्याचा योग्य पद्धतीने निचरा होत नाही. परिणामी मुसळधार पाऊस कोसळला, की पाणी शेतीत भरते असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. यंदा उशिराने का होईना बहुतांश शेतकऱ्यांनी भात शेतीची लागवड केली होती. मात्र, पावसाने शेतकऱ्यांना मोठा फटका दिला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Cricket Association: सलग पाचवा मोसम की नवा 'पाहुणा' खेळाडू? अर्जुन तेंडुलकरच्या गोव्यातील भवितव्याचा फैसला लवकरच!

मुरगाव, वास्कोत वीज बिलांचा शॉक! वाढीव बिलांमुळे संतप्त नागरिकांनी अभियंत्याला घेतलं फैलावर; विद्युत भवनात राडा

Goa Fraud Case: चार्ल्स शोभराजचा ‘चेला’ अखेर गजाआड! 35 वर्षांत 300 पंचतारांकित हॉटेल्‍सना गंडा; गोव्यातही राहून गेला महाठग

अरब व्यापाऱ्यांनी भारतात आणले आणि इथेच स्थिरावले, 'गोरखचिंचे'च्या प्रवासाची रंजक कहाणी

Goa Kala Academy: कला अकादमी, 'क्या पाया क्या खोया?'

SCROLL FOR NEXT