MLA Krishna Salkar Dainik Gomantak
गोवा

MLA Krishna Salkar : ‘जादा सोपो शुल्क भरू; पण एसजीपीडीएने वीज बिल भरावे’

मार्केटमधील किरकोळ मासळी विक्रेत्यांनी आपण जादा सोपो शुल्क भरण्यास राजी असल्याचे स्पष्ट केले आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

salcete news : काही दिवसांपुर्वी एसजीपीडीएचे अध्यक्ष व वास्कोचे आमदार कृष्णा उर्फ दाजी साळकर यांनी एसजीपीडीए किरकोळ मासळी मार्केटची पाहणी केली व नंतर त्यांनी नाले स्वच्छ करण्याचे काम हातात घेतले.

जर मासळी विक्रेते जादा सोपो शुल्क भरण्यास तयार असतील तर स्वच्छता, वीज व पाणी पुरवठ्याची जबाबदारी तसेच साधन सुविधा वाढवून एसजीपीडीए देऊ शकते. त्याला अनुसरून मार्केटमधील किरकोळ मासळी विक्रेत्यांनी आपण जादा सोपो शुल्क भरण्यास राजी असल्याचे स्पष्ट केले आहे.

पण एसजीपीडीएने पाणी व वीज बिल भरावे लागेल. त्याच प्रमाणे स्वच्छता व काही सुविधा वाढवून देण्याची जबाबदारी एसजीपीडीएची असेल. काही दिवस मार्केटमधील वीज पुरवठा खंडित केला होता. मासळी विक्रेत्यांनी एक लाख रुपये वीज बिल भरल्याने सोमवारी वीज पुरवठा पूर्ववत झाला. मासळी विक्रेती बोस्त्यांव हिने सांगितले की, आम्ही ५० रुपये सोपो शुल्क भरायला तयार आहोत.

मात्र, एसजीपीडीएने वीज व पाणी बिले भरावी व स्वच्छता राखण्याची जबाबदारी घ्यावी. मार्केटमध्ये प्रत्येक मासळी विक्रेत्याला वीज मीटर द्यावा. पूर्वी होते. पण मार्केटच्या नूतनीकरणाच्या वेळी ते काढण्यात आले ते अजून बसविले नाहीत,असे बोस्त्यांव यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Crime News: माहेरी गेलेली बायको परत आली नाही, नैराश्यातून तीन पोरींचा जीव घेऊन स्वतःला संपवलं; सुधाकरनं ओलांडली 'क्रूरतेची सीमा'

PM Kisan Nidhi 23rd Installment: पीएम किसानचा 2,000 रुपयांचा हप्ता उद्या खात्यात! यादीत नाव नसल्यास पैसे अडकू शकतात, आत्ताच अशी करा पडताळणी

Goa Development: गोव्यासाठी दिल्लीतून सुटला तब्बल 2000 कोटींचा निधी! केंद्र आणि राज्य सरकार मिळून गोव्याचा चेहरामोहरा बदलणार; कामतांचा विश्वास

Goa Tourism: 'पर्यटनात विविधता, कुशल मनुष्यबळ निर्मितीवर सरकारचा भर', राज्यात 5 नवीन महाविद्यालयांची मुख्यमंत्र्यांकडून घोषणा

Goa Water Crisis: "गोव्यातील पाणीटंचाईला सावंत सरकारच जबाबदार", युरी आलेमाव यांचा हल्लाबोल

SCROLL FOR NEXT