Vehicle Scrap Dainik Gomantak
गोवा

CM Pramod Sawant: केंद्राकडून अधिसूचना आल्‍यानंतर जुनी खासगी वाहने स्‍क्रॅप : सावंत

CM Pramod Sawant: जुन्‍या आणि 15 वर्षांचा टप्पा ओलांडलेली खासगी वाहने स्क्रॅप करण्याची अधिसूचना अजूनही केंद्र सरकारकडून आलेली नाही.

दैनिक गोमन्तक

CM Pramod Sawant: जुन्‍या आणि 15 वर्षांचा टप्पा ओलांडलेली खासगी वाहने स्क्रॅप करण्याची अधिसूचना अजूनही केंद्र सरकारकडून आलेली नाही. त्यामुळे लोक अशा वाहनांचे वार्षिक नोंदणी नूतनीकरण करून ते चालवू शकतात.

केंद्राकडून जुनी वाहने स्क्रॅप कण्याची अधिसूचना आल्यानंतरच मात्र खासगी वाहनांची विल्हेवाट लावली जाईल, असे गोवा वाहतूक विभागाचे

साहाय्यक संचालक बी. ए. सावंत यांनी सांगितले.

गोव्यात स्वच्छ आणि प्रदूषणमुक्त वातावरणाला प्रोत्साहन देण्यासाठी 15 वर्षांवरील सरकारी वाहने यापूर्वीच स्‍क्रॅप करण्यात आलेली आहेत.

केंद्र आणि राज्य सरकार लोकांना इलेक्ट्रिक वाहने खरेदी करण्यासाठी प्रोत्साहित करत आहेत. राज्यात कार्बनचे उत्सर्जन कमी करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. वाहनांच्या घनतेच्या बाबतीत गोवा हे जागतिक स्तरावर 15 व्या क्रमांक आहे, असेही मुख्‍यमंत्री म्‍हणाले.

बी. ए. सावंत म्‍हणाले की, केंद्र सरकारच्या अधिसूचनेनंतर 15 वर्षांवरील सर्व शासकीय वाहनांची नोंदणी नूतनीकरण करता येत नसल्याने ती रद्द करण्यात आलेली आहेत. या सरकारी वाहनांच्या जागी नवीन वाहने येणार आहेत. केंद्राकडून अधिसूचना आल्‍यावर 15 वर्षांवरील खासगी वाहने भंगारात काढली जातील.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sancoale: पहिल्या पत्नीला घटस्फोट दिला, खोटं सांगून केलं दुसरं लग्न; सांकवाळच्या प्रभारी सरपंचांवर गुन्हा दाखल

Goa Politics: '..राहुल गांधींकडे सर्व प्रकार मांडणार'! अमित पाटकर यांनी दिली माहिती; काँग्रेस, NSUI मधील वाद शिगेला

Bits Pilani: ‘बिट्स पिलानी’त विद्यार्थी मृत,कॅम्पसमधील धक्कादायक घटना; पोलिसांचा चहूबाजूंनी तपास

Rashi Bhavishya 17 August 2025: करिअरमध्ये प्रगती, प्रवासाचे योग ; मात्र आरोग्याकडे लक्ष द्या

"तीन वर्षांत 9 विद्यार्थ्यांनी अभ्यासाच्या दडपणामुळे आयुष्य संपवलं, अभ्यासक्रमाचा फेरविचार करावा", आलेमाव यांची सरकारकडे मागणी

SCROLL FOR NEXT