Revolutionary Goans Manoj Parab Dainik Gomantak
गोवा

Revolutionary Goans : राज्य सरकारकडून गोमंतकीय युवकांची फसवणूक

रिव्हॉल्युशनरी गोवन्सच्या मनोज परब यांचा गंभीर आरोप

दैनिक गोमन्तक

पणजी : राज्‍य सरकार राज्‍यातील बेरोजगार युवकांची फसवणूक करत आहे. कौशल्य विकासाच्‍या नावाखाली सरकार युवकांना गंडवत असल्‍याचा आरोप रिव्‍होल्‍युशनरी गोवन्‍स पार्टीचे सर्वेसर्वा मनोज परब यांनी केला. पक्षाच्‍या येथील कार्यालयात घेतलेल्‍या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. सरकारच्‍या अनेक कामांतील भानगडींची माहिती देण्यासाठी आम्‍ही पुढील काही दिवस दररोज पत्रकार परिषद घेऊन सरकारची पोलखोल करणार असल्‍याचे परब यांनी यावेळी सांगितले.

नुकत्‍याच झालेल्‍या विधानसभा अधिवेशनात सरकारने लोकहिताचे अनेक प्रश्‍न चर्चेला येऊ दिले नाहीत. तसेच सरकार कौशल्‍य विकास उपक्रमाद्वारे राज्‍यातील बेरोजगारी कमी करणार असल्‍याचे सांगत आहे, पण कौशल्य विकास करण्यासाठी आवश्‍यक असलेली कोणतीही नवीन यंत्रणा गेल्‍या दहा वर्षांत सरकारने उभारलेली नाही, असा आरोप परब यांनी केला.

केंद्रात आणि राज्‍यात भाजपाचे सरकार सत्तेत आहे. मुख्यमंत्री आमचे डबल इंजिनचे सरकार म्‍हणून सर्वत्र ढोल पीटत आहेत. प्रत्‍यक्षात हे डबल इंजिन काही कामाचे नाही. कारण युवकांच्‍या कौशल्य विकासाकडे ना केंद्राचे लक्ष आहे ना राज्‍य सरकार गंभीर आहे. कारण सरकारने दिलेल्‍या माहितीनुसार कौशल्‍य विकास कार्यक्रमासाठी केंद्र सरकारकडून 56 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. प्रत्‍यक्षात केंद्राने केवळ 10 कोटी रुपये राज्‍याला दिले, असे ते म्‍हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

BCCI Central Contract: बीसीसीआयचा मास्टरस्ट्रोक! रोहित-विराटचं 'डिमोशन' तर शुभमन गिलचं टॉपचं प्रमोशन; सेंट्रल कॉन्ट्रॅक्ट जाहीर

India vs Pakistan: क्रीडाविश्वात हाय-व्होल्टेज ड्रामा! भारत-पाक महामुकाबल्यावर बहिष्काराचं सावट; आयसीसीनं धुडकावल्या मोहसीन नक्वीच्या मागण्या

Nerul: सफर गोव्याची! 400 वर्षांपूर्वी दैवत हलवून मांद्रे येथे सुरक्षितपणे स्थलांतरित करण्यात आले; भक्तीरसातले 'नेरुळ'

Esakal: विश्वासार्हतेचा विजय! मराठी मनाचा मानबिंदू आता डिजिटलचाही 'राजा'; 5.6 कोटी युजर्ससह ई-सकाळ नंबर-1

Surya Grahan 2026: यंदाची महाशिवरात्री ठरणार 'टर्निंग पॉईंट'! सूर्यग्रहण कोणासाठी शुभ-अशुभ? 'या' 4 राशींच्या अडचणी वाढणार

SCROLL FOR NEXT