Dabolim Airport Dainik Gomantak
गोवा

Indian Airports: दाबोळीसह 20 विमानतळांवर 'फोटोग्राफी बॅन'! सुरक्षेच्या कारणास्तव मार्गदर्शन सूचना जारी

Indian Airports Photography Ban: आपत्कालीन खिडकीचे आवरण उघडे ठेवण्यास सांगितले जाते व अन्य खिडक्यांचे बंद ठेवण्यास सांगितले जाते.

Sameer Panditrao

पुणे/पणजी: सुरक्षेच्या कारणास्तव दाबोळीसह देशातील २० विमानतळांवर प्रवाशांना छायाचित्रे काढण्यास मज्जाव करण्यात आला आहे. ‘डीजीसीए’ने शुक्रवारी नवीन मार्गदर्शन सूचना जाहीर केल्या आहेत.

त्यानुसार पुणे विमानतळावर उड्डाण करणाऱ्या अथवा उतरणाऱ्या विमानांतील प्रवाशांना विमान १० हजार फूट उंचीच्या आत असेल तर खिडकीचे आवरण बंद ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या. त्याची अंमलबजावणी सुरू झाली असून, विमान कंपन्या तशा सूचना प्रवाशांना देत आहेत.

...अशा आहेत सूचना

सामान्यपणे विमान कंपन्यांकडून विमानांचे उड्डाण आणि लँडिंग करतेवेळी प्रवाशांना खिडक्यांचे आवरण बंद काढण्यास सांगितले जाते त्याचे प्रमुख कारण विमानांच्या बाहेर पंखाजवळ काही घडत असेल ते तत्काळ कळावे

विमानात बसल्यानंतर प्रकाशासाठी खिडक्यांचे आवरण उघडे ठेवण्यास सांगितले जाते.

आपत्कालीन खिडकीचे आवरण उघडे ठेवण्यास सांगितले जाते व अन्य खिडक्यांचे बंद ठेवण्यास सांगितले जाते.

...हे आहेत विमानतळ

पुणे, लेह, श्रीनगर, जम्मू, पठाणकोट, आदमपूर, चंडीगड, भटिंडा, जैसलमेर, बिकानेर, जोधपूर, हिंडन, आग्रा, कानपूर, बरेली, ग्वालियर, गोरखपूर, भूज, दाबोळी, विशाखापट्टणम आदी विमानतळांवर ‘डीजीसीए’चा नियम लागू आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: "आता बस करा माही भाई!" धोनीला नीट चालताना येईना, IPLपूर्वी फिटनेसवर प्रश्नचिन्ह, व्हिडिओ पाहून फॅन्सचं टेन्शन वाढलं

Savoi Verem: सफर गोव्याची! श्री अनंत देवाचं मनमोहक देऊळ आणि हिरवीगार कुळागरं लाभलेलं 'सावई-वेरे'

Sal River Pollution: गंभीर अवस्था! प्रदूषणामुळे 'साळ नदी'त प्राणवायूचे प्रमाण शून्य, कचरा-सांडपाण्यामुळे धोक्याची घंटा

Goa School Admission: गोव्यात पहिलीच्या प्रवेशाबाबत नियमात मोठा बदल; वयाची अट बदलली, सरकारने घेतला मोठा निर्णय

Opinion: भारतातील शहरांना भविष्यात अधिकाधिक पाण्याची गरज भासणार आहे, पण आपण ही मागणी पूर्ण करू शकू का?

SCROLL FOR NEXT