Pandharpur Wari  Dainik Gomantak
गोवा

Pandharpur Wari : पंढरपूर पायी वारीत मिळतो जगण्याचा अमूल्य मंत्र! मारुती पाटील

Pandharpur Wari : माशेलात भक्तिमहोत्सव उत्साहात : समाजात एकतेचे दर्शन

गोमन्तक डिजिटल टीम

खांडोळा, जीवनात एकदा तरी वारी अनुभवायला हवी. कारण पंढरपूर वारीतून कसे वागावे, कसे आचरण करावे, याचे मार्गदर्शन होते. वारकऱ्यांच्या वारीमुळे सहकार्याची भावना निर्माण होते. उत्तम जीवन जगण्याचा अमूल्य मंत्र दिला जातो, असे मत वारकरी मारुती पाटील यांनी माशेल येथे भक्तिमेळाव्यात व्यक्त केले.

देवकीकृष्ण वारकरी मंडळातर्फे देवकीकृष्ण सभागृहात भक्तिमेळावा साजरा करण्यात आला. यावेळी विठ्ठल पूजन करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून दीपक ढवळीकर, पंच सुनील भोमकर, दामोदर नाईक, अपर्णा आमोणकर, प्रदीप हळदणकर उपस्थित होते.

ढवळीकर म्हणाले, पंढरीची वारी महत्त्वाची असून देवकीकृष्ण मंडळाचे वारकरी नियमित वारी करतात. गेल्या अनेक वर्षांपासून आषाढी वारी सुरू असून या वारीमुळे एकतेचे दर्शन होते. एका वारीतून अलीकडे दोन वाऱ्या निघत आहेत.

विठ्ठल नामाचा जयघोष आरोग्यसाठीसुद्धा महत्त्वाचा आहे. सातत्याने विठोबाचे नामस्मरण केले तर मन प्रसन्न राहते. वेगळी ऊर्जा प्राप्त होते. याबाबत अलीकडील संशोधनाने सिद्ध झाले आहे. आजकालच्या वाढत्या ताणतणावाच्या वातावरणात ध्यानधारणा आवश्‍यक आहे. त्यासाठी ‘विठ्ठल विठ्ठल’ या नामघोषाने मनाला शांत लाभते आणि ताणविरहित आपण जगू शकतो, असे पाटील म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Crime News: माहेरी गेलेली बायको परत आली नाही, नैराश्यातून तीन पोरींचा जीव घेऊन स्वतःला संपवलं; सुधाकरनं ओलांडली 'क्रूरतेची सीमा'

PM Kisan Nidhi 23rd Installment: पीएम किसानचा 2,000 रुपयांचा हप्ता उद्या खात्यात! यादीत नाव नसल्यास पैसे अडकू शकतात, आत्ताच अशी करा पडताळणी

Goa Development: गोव्यासाठी दिल्लीतून सुटला तब्बल 2000 कोटींचा निधी! केंद्र आणि राज्य सरकार मिळून गोव्याचा चेहरामोहरा बदलणार; कामतांचा विश्वास

Goa Tourism: 'पर्यटनात विविधता, कुशल मनुष्यबळ निर्मितीवर सरकारचा भर', राज्यात 5 नवीन महाविद्यालयांची मुख्यमंत्र्यांकडून घोषणा

Goa Water Crisis: "गोव्यातील पाणीटंचाईला सावंत सरकारच जबाबदार", युरी आलेमाव यांचा हल्लाबोल

SCROLL FOR NEXT