Bihar Dainik Gomantak
गोवा

Bihar: भाजप आमदार म्हणतात, 'CM नितीश कुमार यांनी गोव्याचे राज्यपाल व्हावे, तरच त्यांना शांती मिळेल'

बबलू यांच्या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ निर्माण झाली आहे.

Pramod Yadav

Bihar: बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्याबाबत माजी मंत्री आणि भाजप आमदार नीरज कुमार बबलू यांनी मोठे वक्तव्य केले आहे. बबलू यांच्या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ निर्माण झाली आहे.

मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी गोव्याचे राज्यपाल व्हावे, तरच त्यांना शांती मिळेल, असे वक्तव्य नीरज कुमार बबलू यांनी केले आहे.

माजी मंत्री आणि छटापूरचे भाजप आमदार नीरज कुमार बबलू यांनी बिहारमधील सहरसा येथे रविवारी (24 डिसेंबर) पत्रकार परिषद घेतली.

यावेळी बबलू यांनी नितीशकुमार यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. इंडिया आघाडीच्या बिहारमधील अवस्थेमुळे नितीशकुमार सध्या दबावाखाली जगत आहेत. दबावामुळे नितीशकुमार विचित्र गोष्टी करत असून, विचित्र वक्तव्य देखील करत आहेत.

'मला वाटते मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी एकदा माननीय पंतप्रधान यांच्याशी बोलून गोव्याचे राज्यपाल व्हावे. तेच त्यांच्यासाठी चांगले होईल, त्यांना शांती मिळेल. मला वाटते की मुख्यमंत्री नितीश कुमार यांना आता शांततापूर्ण नोकरीची गरज आहे आणि गोव्यात गेल्याने त्यांना शांतात मिळेल.

गोव्याला जाण्याने नितीश कुमार यांची तब्येतही चांगली राहील. म्हणूनच त्यांनी प्रयत्न करायला हवेत, असे नीरज कुमार बबलू म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Firecracker Factory Blast: आंध्र प्रदेशात काळाचा घाला! फटाक्याच्या कारखान्यात भीषण स्फोट, 18 कामगारांचा मृत्यू; मृतांचा आकडा वाढण्याची भीती

"त्यानं माझं आयुष्य उद्ध्वस्त केलं, म्हणून मी त्याला गोळ्या घातल्या'' मुलाच्या डोळ्यादेखत बापाची हत्या; आरोपीनं व्हिडिओ बनवून दिली गुन्ह्याची कबुली

Explainer: इस्रायल अन् अमेरिकेचा इराणवर भीषण हल्ला! युद्धाचा भडका का उडाला? जाणून घ्या वादाचं 'मेन' कारण VIDEO

Israel US Attack on Iran: मध्यपूर्वेत युद्धाचा वणवा पेटला! भारतीय नागरिकांसाठी 'ट्रॅव्हल ॲडव्हायजरी' जारी; सुरक्षा नियमांचे काटेकोर पालन करण्याच्या सूचना

"आई-बाबा मला माफ करा, तुमचे स्वप्न मी पूर्ण करु शकले नाही" पोलीस भरतीतील अपयशाच्या धक्क्यातून 26 वर्षीय तरुणीनं संपवलं जीवन

SCROLL FOR NEXT