Mumbai Goa Vande Bharat Train Dainik Gomantak
गोवा

Mumbai Goa Vande Bharat Train: आता दररोज धावणार मुंबई-गोवा वंदे भारत एक्स्प्रेस; नवे वेळापत्रक जाहीर

पावसाळा सुरु झाल्यानंतर वेळापत्रकात बदल करुन आठवड्यातील केवळ तीन दिवस वंदे भारत धावत होती.

Pramod Yadav

Mumbai Goa Vande Bharat Train: मुंबई ते गोवा दरम्यान धावणाऱ्या वंदे भारत एक्स्प्रेसचे गैर-पावसाळी वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. वंदे भारत आता शुक्रवार वगळता दररोज धावणार आहे.

पावसाळा सुरु झाल्यानंतर वेळापत्रकात बदल करुन आठवड्यातील केवळ तीन दिवस वंदे भारत धावत होती.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दोन महिन्यापूर्वी उद्घाटन झालेल्या मुंबई ते गोवा वंदे भारत एक्स्प्रेसला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. वंदे भारतमुळे प्रवासांच्या वेळेची बचत होणार आहे, एक्सप्रेसमुळे मुंबई ते गोवा अंतर आठ तासांत पूर्ण होणार आहे.

पावसाळ्यात एक्स्प्रेसच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला होता, तेव्हापासून ही ट्रेन आठवड्यातील तीन दिवस चालवली जाते. त्यात आता बदल करून सेवा पूर्ववत केली जाणार आहे. एक नोव्हेंबरपासून नवे वेळापत्रक लागू करण्यात येणार आहे. दुरुस्तीच्या कामानिमित्त केवळ शुक्रवारी ही ट्रेन बंद ठेवली जाणार आहे.

मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते मडगाव स्टेशनपर्यंत धावणाऱ्या या ट्रेनला आठ डब्बे असून 586 किलोमीटरचे अंतर पार करण्यासाठी केवळ आठ तासांचा वेळ लागतो.

या मार्गावरील अन्य फास्ट रेल्वेपेक्षा हा कालावधी तीन ते चार तासांनी कमी आहे. यामुळे या गाडीला प्रवाशांची पसंती मिळत आहे.

आगामी येणाऱ्या दिवाळीच्या सुट्टया आणि नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी कोकण आणि गोव्यात जाणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढली आहे. त्यामुळे प्रवासी वंदे भारत एक्सप्रेसला पंसती देत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Monsoon Flowers: 'सोनेरी हरणा, गुलाबी तेरडे, शुभ्र तुतारी'! श्रावणातील फुलांचा अवर्णनीय सोहळा

Khazan Farming: गोव्यातील शेकडो वर्षांपूर्वीची परंपरा धोक्यात! खारफुटींचे अतिक्रमण वाढले; खाजन शेती मरणासन्न

Bicholim Murder: डिचोलीत 5 जणांचे खून! परप्रांतीयांचा संबंध चिंताजनक; मारेकरी पोलिसांच्या ताब्यात

Sattari: सत्तरीत जनजीवन विस्कळीत; झाडांची मोठ्या प्रमाणावर पडझड, लाखोंची हानी

Goa Electricity Tariff: वीज खात्याचेच 74.82 कोटींचे बिल थकीत! अमित पाटकरांनी केली पोलखोल; तुटीमुळेच वीजदर वाढवल्याचा दावा

SCROLL FOR NEXT