Movement in Goa Dainik Gomantak
गोवा

गोव्यातील 'पर्यटन' आंदोलनाने वेधले जगाचे लक्ष

पर्यावरणाचा मुद्दा: हजारो लोकांचा रेल्वे रुळावर तब्बल पाच तास ठिय्या

दैनिक गोमन्तक

मडगाव: 1 नोव्हेंबर 2020 या तारखेला गोव्यातील पर्यटन लढ्याच्या इतिहासात एक महत्त्वाचे स्थान आहे. कारण ‘गोयांत कोळसो नाका’ या बावट्याखाली त्या रात्री हजारोंच्या संख्येत आंदोलक चांदर येथे येऊ लागले होते. रात्र वाढत जात होती तशी आंदोलकांची संख्याही वाढत होती. ही संख्या 5 हजारांवर पोहोचली. त्यांची एकच मागणी होती, रेल्वे मार्ग दुपदरीकरण नको.

या हजारोंच्या संख्येने आलेल्या आंदोलकांनी चक्क रेल्वे रुळावर ठाण मांडून तिथे मेणबत्त्या पेटविल्या. यावेळी काही जणांनी तर गाणी म्हणत आंदोलकांना स्फूर्ती आणण्याचे काम केले. चक्क पाच तास ते या रेल्वे रुळावर बसले होते. त्यांचा एकच ध्यास आणि उद्देश होता की गोव्याच्या पर्यावरणाचा ऱ्हास करणारे हे दुपदरीकरण कोणत्याही प्रकारे बंद करायचेच. याच आंदोलनाने खऱ्या अर्थाने संपूर्ण जगाचे लक्ष या तीन रेखीय प्रकल्पाना केल्या जाणाऱ्या विरोधाकडे ओढले गेले. त्यामुळेच केंद्रीय उच्चाधिकार समितीला या प्रश्नात लक्ष घालावे लागले. त्यातूनच त्यांनी पश्चिम घाट परिसरात हा रस्ता करण्यास विरोध दर्शविला आणि सर्वोच्च न्यायालयानेही त्या शिफारसी मानून घेतल्या.

‘त्या दिवशी आम्ही काय सांगत होतो तेच खरे असल्याचे आजच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निकालातून स्पष्ट झाले’, अशी प्रतिक्रिया या आंदोलनातील प्रमुख नेते कॅप्टन विरियातो फेर्नांडिस यांनी व्यक्त केली. ‘भाजप सरकार विकासाचा मुद्दा पुढे करून हे तिन्ही प्रकल्प पुढे रेटू पाहत होते आणि आम्ही हा विकास सर्वसामान्य गोवेकारांचा नसून केवळ काही कंपन्यांचा आहे, असे घसा ओरडून सांगत होतो. त्यामुळे पर्यावरणाचा ऱ्हास होईल असे जे आम्ही सांगत होतो त्यावर आजच्या निर्णयाने शिक्कामोर्तब केले.’ अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

आज न्यायालयाने या लोकभावनेची कदर केली आहे. गोवा सरकारने त्याची दखल घेऊन केंद्राला हे तिन्ही प्रकल्प रद्द करण्यासाठी भाग पाडावे अशी मागणी केली. हे तिन्ही प्रकल्प रद्द होईपर्यंत आमचे आंदोलन थांबणार नाही असे यांनी ओलेंसीओ सिमोईस सांगितले. न्यायालयाचा निकाल म्हणजे 1 नोव्हेंबर रोजी गोवा सांभाळून ठेवण्यासाठी जे लोक रस्त्यावर उतरले होते, त्या सर्वांचा विजय अशी प्रतिक्रिया या आंदोलनातील नेते आणि तृणमूल काँग्रेसचे उपाध्यक्ष डॉ.जॉर्सन फेर्नांडिस यांनी व्यक्त केली.

लोकभावनेचे अनोखे प्रदर्शन

या आंदोलनाचा प्रभाव एवढा होता, की काँग्रेस सोडून भाजपात गेलेल्या सासष्टीच्या आमदारांना सरकारच्या इच्छेविरुद्ध जाऊन आंदोलनाला पाठिंबा द्यावा लागला. ते आंदोलन म्हणजे लोकभावनेचे एक अनोखे प्रदर्शन होते अशी प्रतिक्रिया या आंदोलनातील आणखी एक नेते ओलेंसीओ सिमोईस यांनी दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

"मोदी विरोधकांना घाबरवतात म्हणून मी तसे म्हणालो", मल्लिकार्जुन खर्गेंचं 'त्या' जहरी टीकेवर स्पष्टीकरण; भाजपकडून माफीची मागणी कायम VIDEO

VIDEO: 'गुजराती अडाणी' नंतर आता पंतप्रधान मोदी 'आतंकवादी'! मल्लिकार्जुन खर्गे यांची जीभ पुन्हा घसरली; तामिळनाडूचं राजकीय वातावरण तापलं

PM Kisan 23rd Installment: ठरलं! 'या' दिवशी खात्यात जमा होणार 2,000 रुपये, आजच उरका 'ही' 4 महत्त्वाची कामं अन्यथा पैसे अडकणार

Women Reservation Bill 2026: 30 वर्षांची प्रतीक्षा अन् शेवटी निराशाच! लोकसभेत 'महिला आरक्षणा'चं स्वप्न का भंगलं?

Operation Sindoor: घरात घुसून पाकड्यांना ठोकलं! एक वर्षांनंतरही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळात; 'ऑपरेशन सिंदूर'नं मोडलं कंबरडं

SCROLL FOR NEXT