Assagao Incident Dainik Gomantak
गोवा

Assagao Incident: उघड्या विहिरीत पडून 54 वर्षीय व्यक्तीचा दुर्देवी मृत्यू, आसगावातील धक्कादायक घटना; स्थानिकांमध्ये संताप

Chakali Balraj Assagao Accident: आसगावातील मुनांग वाडो येथे आज (21 ऑगस्ट) दुपारी एक अत्यंत दुर्देवी घटना घडली.

Manish Jadhav

Chakali Balraj Assagao Accident: आसगावातील मुनांग वाडो येथे आज (21 ऑगस्ट) दुपारी एक अत्यंत दुर्देवी घटना घडली. येथील एका उघड्या आणि असुरक्षित विहिरीत पडून एका 54 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला. मयत व्यक्तीचे नाव चकाली बलराज असे असून, ते मूळचे तेलंगणाचे रहिवासी होते. बलराज या परिसरातच धोबी म्हणून काम करत होते. या धक्कादायक घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.

नेमकं काय घडलं?

दरम्यान, ही घटना दुपारी 2.36 च्या सुमारास सोरो हॉटेलजवळ घडली. मिळालेल्या माहितीनुसार, बलराज हे विहिरीच्या बाजूला गवत कापत होते. त्याचवेळी, त्यांचा अचानक तोल गेल्याने ते 10 फूट खोल असलेल्या विहिरीत पडले. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, ही विहीर पूर्णपणे उघडी होती. तिच्याभोवती कोणतीही संरक्षक भिंत नव्हती. अशा उघड्या विहिरींमुळे परिसरात नेहमीच धोक्याची शक्यता असते आणि या निष्काळजीपणाचा फटका आज बलराज यांना बसला.

एक तास चालले बचावकार्य

घटनेची माहिती मिळताच स्थानिकांनी तात्काळ अग्निशमन दलाला पाचारण केले. म्हापसा अग्निशमन सेवा दल, उपअधिकारी प्रकाश कन्नाइक यांच्या नेतृत्वाखाली घटनास्थळी त्वरित पोहोचले. अग्निशमन दलाच्या जवानांनी तात्काळ बचावकार्य सुरु केले. जवळपास एक तास चाललेल्या या बचावकार्यात अनेक अडथळे आले. विहिरीत भरपूर पाणी आणि चिखल असल्याने बचावकार्य करणे कठीण झाले. मोठ्या प्रयत्नांनंतर, अग्निशमन दलाच्या जवानांनी बलराज यांना बाहेर काढले. मात्र तोपर्यंत खूप उशीर झाला होता. त्यांना बेशुद्ध अवस्थेत बाहेर काढण्यात आले. तातडीने जवळच्या रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

उघड्या विहिरींबाबत नागरिकांची चिंता

दुसरीकडे, या हृदयद्रावक घटनेमुळे स्थानिक लोक संताप व्यक्त करत आहेत. परिसरातील अनेक विहिरी अशाच उघड्या आणि असुरक्षित अवस्थेत आहेत. अशा प्रकारच्या दुर्घटना टाळण्यासाठी प्रशासनाने तातडीने पावले उचलण्याची मागणी स्थानिकांनी केली आहे. नागरिकांनी प्रशासनाला अशा विहिरींना संरक्षक भिंत बांधण्यास किंवा जाळी लावून सुरक्षित करण्याची विनंती केली आहे, जेणेकरुन भविष्यात असे जीवघेणे अपघात टाळता येतील.

या घटनेने उघड्या विहिरींची सुरक्षितता सुनिश्चित करण्याची गरज अधोरेखित केली आहे. केवळ प्रशासनावर अवलंबून न राहता, स्थानिक समुदाय आणि जमीन मालकांनीही आपली जबाबदारी समजून घेणे महत्त्वाचे आहे, जेणेकरुन अशा दुर्देवी घटना पुन्हा घडणार नाहीत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Vijay Hazare Trophy: गोव्याची झुंज अपयशी! 'विजय हजारे ट्रॉफी'त महाराष्ट्राचा 5 धावांनी विजय, ऋतुराजची शतकी खेळी पडली 'महागात'

eSakal Comscore: मराठी मीडियात 'ई-सकाळ'चा डंका! 19.5 मिलियन युजर्ससह ठरली देशातील नंबर वन वेबसाइट

माजी मुख्य न्यायमूर्ती रिबेलोंच्या निवेदनाचा अभ्यास करून पुढील निर्णय : मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत

Goa Traffic Police: 'बेशिस्त' वाहनचालकांना वाहतूक पोलिसांचा दणका! वर्षभरात 94 लाखांहून अधिक दंड वसूल; 5,025 जणांवर कारवाई

Lokayukta Goa: गोव्याला मिळणार नवे लोकायुक्त! न्यायमूर्ती संदीप शिंदे यांच्या नावावर शिक्कामोर्तब

SCROLL FOR NEXT