Tiger Project Dainik Gomantak
गोवा

Goa Tiger Project: गाव, घरे, शेतजमिनी वगळूनच व्याघ्रक्षेत्र करा; वेळूस ग्रामस्थांचा आग्रह

सत्तरीच्या ग्रामीण भागात लोक वस्ती असून गाव, मंदिरे, घरे, रस्ते, उत्पन्नाच्या जागा तथा शेतजमिनी वगळूनच व्याघ्र क्षेत्र करावे अशी मागणी नागरिकांनी केली.

दैनिक गोमन्तक

Goa Tiger Project: येणारा काळ हा सत्तरीच्या जनतेच्या अस्तित्वाचा बनलेला आहे. कारण म्हादई अभयारण्या बरोबरच आता व्याघ्र क्षेत्राचे मोठे महासंकट लोकांवर येणार आहे. त्यामुळे सत्तरीच्या जनतेने आतातरी कोणाच्या दबाबाखाली न येता स्वत:च्या अस्तित्वासाठी लढा दिला पाहिजे. अन्यथा आपली पुढची पिढी आम्हाला दुषणे देईल.

सत्तरीच्या ग्रामीण भागात लोक वस्ती असून गाव, मंदिरे, घरे, रस्ते, उत्पन्नाच्या जागा तथा शेतजमिनी वगळूनच व्याघ्र क्षेत्र करावे, असा सूर वेळूस वाळपई येथे सातेरी मंदिराच्या सभामंडपात आयोजित व्याघ्र क्षेत्र, म्हादई अभयारण्य या परिसंवादात विविध जागृत नागरिकांनी आळवला.

रविवारी सकाळी झालेल्या या परिसंवादात सत्तरीतील विविध भागातील ग्रामस्थांनी सहभागी होऊन आपली मते मांडली.

सामाजिक कार्यकर्ते ॲड. गणपत गावकर म्हणाले २४ जुलै रोजी उच्च न्यायालयाने जारी केलेल्या आदेशानुसार सरकारला तीन महिन्यांत व्याघ्र क्षेत्राविषयी कार्यवाही करावी, असे बजावल्याने सत्तरीत भीती परसली आहे. १९९९ साली म्हादई अभयारण्यानंतर आता व्याघ्रक्षेत्र हे लोकांच्या अस्तित्वावरचे संकट बनले आहे.

म्हादई अभयारण्य क्षेत्रातील गावे

  • डोंगुर्ली पंचायत : डोंगुर्ली, हिवरे, हिवरे बुद्रुक, गोळावली, सुर्ला, पाली, चरावणे, नानेली.

  • खोतोडा : सुरुंगुली, शिरसोडे, गवाणे, असोडे.

  • सावर्डे : कडवळ, करंझोळ, पेंडाळे, झाडानी.

  • नगरगाव : ब्रम्हाकरमळी, नानोडे, शिंगणे, शेळप बुद्रुक, वायंगिणी, कोदाळ, साट्रे, देरोडे.

  • म्हाऊस : झर्मे, दाबे 1, दाबे 2, कोपार्डे.

  • मोर्ले : पणसुले.

  • केरी : केळावडे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Chapoli Dam: चापोली धरणातील पाणीसाठा चिंताजनक पातळीवर, पाणीटंचाईचे संकट गडद; केवळ 400 हेक्टोमीटर पाणी शिल्लक

गेल्या 5 वर्षांत रस्ते अपघातांत 1,300 जणांचा मृत्यू; भाजप सरकारचा बेजबाबदार कारभार कारणीभूत, काँग्रेसचा आरोप

'गोमेकॉ'तील कंत्राटी कर्मचाऱ्यांची नोकरीत कायम करण्याची मागणी, 12 वर्षांपासून सेवा बजावणाऱ्यांचे शासनाला निवेदन

Goa Agriculture: पाऊस काय पडेना! राज्‍यातील शेतकरी गलितगात्र! तरवा सुकला, खते मातीमोल; सर्वच पिकांना धोका

Cyber Fraud: अज्ञात लिंकवर क्लिक करणं पडलं महागात! फातोर्डा येथील महिलेची ऑनलाइन फसवणूक, 10 लाख उकळले

SCROLL FOR NEXT