Mahadayi Water Dispute |Goa  Dainik Gomantak
गोवा

Mahadayi Water Dispute: सत्य काय ते शेवटी बाहेर आलेच; शहांनीच दिली कबुली

म्हादईचे पाणी वळविणे हा कर्नाटक आणि गोवा सरकारने घेतलेला संयुक्त निर्णय आहे, असे शहा यांनी म्हटले.

दैनिक गोमन्तक

Mahadayi Water Dispute: म्हादईचा सौदा कर्नाटककडे करण्यात गोवा सरकारही भागीदार आहे, हा आम्ही जो आरोप करत होतो, तो आता सिद्ध झाला आहे. खुद्द केंद्रीयमंत्री अमित शहा यांनी तशी थेट ग्वाही दिली आहे.

सत्य काय ते शेवटी बाहेर आलेच, अशी प्रतिक्रिया गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांनी व्यक्त केली आहे.

प्रमोद सावंत यांनीच म्हादईचा खून केला आहे. म्हादईचे पाणी वळविणे हा कर्नाटक आणि गोवा सरकारने घेतलेला संयुक्त निर्णय आहे, असे शहा यांनी म्हटले.

हे जर खरे नसेल तर मुख्यमंत्र्यानी केंद्रीय नेतृत्वाला जाब विचारावा, अन्यथा त्यांनी पदाचा राजीनामा द्यावा, असे आव्हान सरदेसाई यांनी दिले आहे.

कर्नाटकच्या पाणी पिपासू शेतकऱ्यांची तहान भागविण्यासाठी मुख्यमंत्री सावंत यांनी म्हादईचा गळा घोटला. हे सैतानी कृत्य आहे. आपली खुर्ची सांभाळून ठेवण्यासाठी त्यांनी गोव्यातील पुढील पिढीला दुष्काळाच्या गर्तेत नेऊन सोडले आहे.

मुख्यमंत्र्यांचा खोटारडेपणा बस्स झाला, आता त्या पदावर त्यांना राहण्याचा अधिकार नाही, असे सरदेसाई यांनी म्हटले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Padma Shri Prasad Sawkar: आठवणीत वसलेले प्रसाद सावकार

आगामी निवडणुकांमध्ये तरुणांसह महिलांना देणार संधी! 'जेनझी'शी राजकीय 'कनेक्ट' गरजेचा- विजय सरदेसाई

Goa Politics: भाजप सरकारचा अहंकार जनता मोडेल! अरविंद केजरीवालांची टीका, कारापूर आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतल्याचा केला निषेध

Section 39A Protest: आता गावागावांतून आंदोलन! कलम '39अ'विरोधात आमदार वीरेश बोरकर यांची घोषणा

खरी कुजबुज: सरकारची अशीही हुशारी!

SCROLL FOR NEXT