Kalasa- Mahadayi River Dainik Gomantak
गोवा

Kalasa- Mahadayi River: ‘कळसा’मुळे म्हादईच्या उपनद्यांवर परिणाम

प्रवाह थांबला: साट्रे, उस्ते परिसरातील नद्यांची जलपातळी घटली; पात्रेही कोरडे पडू लागली

गोमन्तक डिजिटल टीम

कर्नाटकच्या कळसा-भांडुरा प्रकल्पामुळे म्हादईचा गळा घोटला जात आहे. मलप्रभेत पाणी वळविण्यासाठी कणकुंबीजवळ कळसा उपनदीचे पात्र उद्‍ध्वस्त केले. त्यामुळे त्या परिसरातील झरे, नाले, नैसर्गिक जलस्रोत बंद पडले असून गोव्याकडे येणारे पाणी कमी झाल्यामुळे जानेवारी महिन्यातच साट्रेतील नदीत पाणी कमी झाले आहे. पाणी कमी झाल्यामुळे सहजपणे चालत नदी पार करता येते. साट्रे, उस्तेतील उपनद्यांवर परिणाम झाला असून या पाण्यावर अवलंबून असणाऱ्या बागायती, शेतीला मोठा फटका बसणार आहे.

कणकुंबीतील कळसा नाला उद्‍ध्वस्त झाल्यामुळे पावसाळ्यात म्हादईकडे येणारे पाणी कमी झाले असून अद्यापही काही प्रमाणात उलट्या दिशेन पाणी मलप्रभेत जात आहे. त्यामुळे उस्ते, साट्रेतील नदीत पाणी कमी झाल्याने जानेवारीतच पात्र कोरडे पडले आहे. काही ठिकाणी नदीच कोंडी निर्माण झाल्या आहेत.

गुरुवारी प्रत्यक्ष पाहणी केली असता, अनेक ठिकाणी नदीतील दगड उघडे पडलेले दिसत आहेत. त्यामुळे एप्रिल, मे महिन्यात या परिसरात मोठी पाणी टंचाई जाणवणार आहे. याचा परिणाम थेट बागायती, शेतीबरोबरच नदीच्या काठावरील गावांवरही पाणी टंचाईची टांगती तलवार आहे.

बंधाऱ्यामुळे पाणी दिसते:-

१ . सुर्लातून खालच्या बाजूला असलेल्या साट्रेत पाणीसाठा कमी झाला असून फक्त बंधारा बांधल्यामुळे थोडे पाणी साठलेले दिसते. अन्यथा या ठिकाणी पूर्ण पात्र कोरडे झाले असते. तसेच चिखलीतून येणारे पाणीही कमी झाले आहे. गोळावली रिवे-सुर्लातून पुढे वेळसांच्या नदीतून जल प्रवाह खाली येतो, पण वरच्या भागातील पाणी कमी झाल्याने जानेवारी महिन्यातच येथील पात्रही सुकत चालले आहे.

२. कर्नाटकने घाटावर कणकुंबी परिसरात केलेल्या कालव्याच्या कामामुळे अलीकडे उस्ते, साट्रे, गोळावली येथील उपनद्यातील पाणी कमी होत आहे. गेल्या पावसाळ्यात धबधबेही नेहमीसारखे दिसले नाहीत. कारण घाटावरून येणारे पाणी कमी झाले. बारामाही वाहणारे नैसर्गिक स्रोतही कमी झाले आहेत.

‘कळसा’चे पाणी हवेच!

उलट्या दिशेने मलप्रभा नदीकडे कळसा उपनदी व परिसरातील वळवलेले पाणी पूर्वीप्रमाणे गोव्यात यायलाच हवे. तरच साट्रे, उस्तेतील नदीत जल कायम राहणार आहेत. अन्यतः तो जानेवारीपासूनच बंद होणार आहे. हे संकट टाळण्यासाठी येत्या पावसाळ्यापूर्वी कळसाचे पाणी पूर्ववत गोव्याकडे येणे गरजेचे आहे. त्यासाठी शासनाने शक्य ते सर्व प्रयत्न केले पाहिजेत, असे मत साट्रे, सत्तरीतील शेतकऱ्यांचे आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

"मोदी विरोधकांना घाबरवतात म्हणून मी तसे म्हणालो", मल्लिकार्जुन खर्गेंचं 'त्या' जहरी टीकेवर स्पष्टीकरण; भाजपकडून माफीची मागणी कायम VIDEO

VIDEO: 'गुजराती अडाणी' नंतर आता पंतप्रधान मोदी 'आतंकवादी'! मल्लिकार्जुन खर्गे यांची जीभ पुन्हा घसरली; तामिळनाडूचं राजकीय वातावरण तापलं

PM Kisan 23rd Installment: ठरलं! 'या' दिवशी खात्यात जमा होणार 2,000 रुपये, आजच उरका 'ही' 4 महत्त्वाची कामं अन्यथा पैसे अडकणार

Women Reservation Bill 2026: 30 वर्षांची प्रतीक्षा अन् शेवटी निराशाच! लोकसभेत 'महिला आरक्षणा'चं स्वप्न का भंगलं?

Operation Sindoor: घरात घुसून पाकड्यांना ठोकलं! एक वर्षांनंतरही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळात; 'ऑपरेशन सिंदूर'नं मोडलं कंबरडं

SCROLL FOR NEXT