Harvalem Waterfalls Dainik Gomantak
गोवा

हरवळे धबधबा अजूनही प्रवाहित

मोसमी पावसाळा सूरू होईपर्यंत तरी धबधबा आटण्याची शक्यता कमीच आहे.

दैनिक गोमन्तक

डिचोली: पावसाळा जवळ आला असला, तरी पावसाळी पर्यटनासाठी जगप्रसिद्ध असलेला हरवळे धबधबा यंदा अजूनही प्रवाहित असून, मोसमी पावसाळा सूरू होईपर्यंत तरी धबधबा आटण्याची शक्यता कमीच आहे.

पावसाळ्यात हा धबधबा घसघसून वाहत असतो. पाऊस पावसाळा संपल्यानंतर दरवर्षी साधारण एप्रिल-मे महिन्यात या धबधब्याचा प्रवाह कमी होत असतो. बऱ्याचदा मे महिन्याच्या मध्यापर्यंत हा धबधबा पूर्णपणे आटत असतो. यापुर्वी ऐन शिवरात्री उत्सवावेळी खाणपिटातील पाणी सोडून हा धबधबा प्रवाहित करण्यात आला होता. यावर्षी मात्र अजूनही धबधब्याचा प्रवाह समाधानकारक आहे. अजूनपर्यंत अधूनमधून पडणाऱ्या पावसामुळे धबधबा कायम प्रवाहित राहिला आहे.

पावसाळी पर्यटनासाठी प्रसिद्ध असला, तरी या धबधब्यावर स्थानिक पर्यटकांची ये-जा चालूच असली, तरी सुटीचे दिवस वगळता अन्य दिवशी पर्यटकांचा आकडा कमी असतो. अधूनमधून विदेशी पर्यटकही या धबधब्यावर येतात, असे येथील नागरिकांनी सांगितले.

सुरक्षा व्यवस्था तैनात

हरवळे धबधब्याच्या पायथ्याशी पाण्यात आंघोळ करणे धोक्याचे असल्याने सध्या धबधब्यावर सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. धबधब्यावर आंघोळ करताना यापूर्वी काही पर्यटकांना जीव गमवावे लागले आहेत. प्राणहानी टाळण्यासाठी धबधब्यावर सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sanjivani Sugar Factory: 'संजीवनी'च्या पुनरुज्जीवन प्रक्रियेला गती, निविदा मुदत 5 फेब्रुवारीपर्यंत वाढवली; प्रकल्पासाठी 4 कंपन्यांकडून उत्सुकता

Goa Drug Case: कपड्यांखाली लपवले होते 3 कोटींचे ड्रग्स! मोपा विमानतळावरून विदेशी पर्यटकाला अटक

MI VS RCB: 6,4,6,4... नॅडिन डी क्लार्कची झुंजार खेळी, आरसीबीनं मुंबईच्या तोंडून हिसकावला विजयाचा घास Watch Video

Shukra Budh Yuti 2026: धनिष्ठा नक्षत्रात 'लक्ष्मी-नारायण' योग: 'या' 4 राशींना मिळणार अपार यश आणि धनदौलत!

Goa Nightclub Fire: 'बर्च' घटना अपघात म्हणून सोडून द्यावी? 25 जण जिवंत जळाले तरी सरकार गप्प का? युरी आलेमाव यांचा सवाल

SCROLL FOR NEXT