Goa Farmer Dainik Gomantak
गोवा

Agriculture News : राज्यातील कृषीला चालना ; शेतकरी सरसावताहेत पुढे!

गोमन्तक डिजिटल टीम

Agriculture News : पणजी,गोव्याच्या अर्थकारणात कृषी हे एक प्रमुख क्षेत्र आहे. मागील काही वर्षांत राज्यातील कृषीला चालना मिळाली आहे. राज्य अन्नधान्य, भाजीपाला तसेच इतर खाद्यपदार्थांच्या अनुषंगाने स्वयंपूर्ण व्हावे यासाठी राज्य सरकारद्वारे विविध योजना तसेच उपक्रमही राबविण्यात येत आहेत.

राज्यात पर्यटनासोबत कृषीलादेखील वाव आहे. शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात पीक लागवड करावी यासाठी सरकारद्वारे विविध प्रकारच्या सबसिडीदेखील देण्यात येतात. सरकारी योजनांचा लाभ घेत अनेक शेतकरी उत्तमप्रकारे शेती करतात.

परंतु अजूनही भाजीपाला, कडधान्य तसेच इतर खाद्यपदार्थांसाठी शेजारील राज्यांवर अवलंबून राहावे लागते.

राज्यात खरीप तसेच रब्बी पिके मोठ्या प्रमाणात घेतली जातात. कुळागार, काजू तसेच इतर प्रकारच्या पिकांची लागवडदेखील होते. राज्यातील एकूण १ लाख ४३ हजार ५४१ हेक्टर क्षेत्रफळ लागवडीखाली आहे.

लागवडीखालील क्षेत्रफळ खालीलप्रमाणे

पिके - क्षेत्रफळ (हेक्टरमध्ये)

भात - ३१,५१९

कडधान्ये आणि तेलबिया - ३,६६७

काजू - ५६,९३४

सुपारी - २,०८१

मिरी - ८६१

मसाले झाडे - २६६

कोकम - ९१

बटाटा - ८१

ऊस - ४९१

आंबा - ५,०७१

केळी - २,४८०

अननस - ३३४

इतर बागायती पिके - ३९८२

भाजीपाला - ८,३७४

नारळ - २६,६८३

ऑइलपाम - ६२६

राज्यात मागील काही वर्षांत भातशेतीमध्ये घट झाली आहे; परंतु राज्यात बागायती तसेच भाजीपाला लागवडीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. नारळ, मिरी, सुपारी, अननस, तसेच पालेभाज्यांच्या लागवडीकडे शेतकऱ्यांचा अधिक कल आहे. - नेव्हील आल्फोन्सो, कृषी संचालक

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Government Schools: ...गेल्या 5 वर्षांत ट्रेंड बदलला, शासनाचे सरकारी शाळांना प्राधान्य; CM सावंत

Goa Today's News Live: ख्रिस्ती समाजाच्या मोर्चाचा वाहतुकीला फटका; अनेकांची गैरसोय

Saint Francis Xavier: संत फ्रान्सिस झेवियर यांच्या अवशेषांच्या DNA चाचणी मागणीवरून गोव्यात वाद का पेटला?

Goa Crime: लग्नाचे आमिष देवून अत्याचार करणाऱ्या ओडिशातील तरुणाचा कोर्टाने फेटाळला जामीन!

गोव्यात गेल्या दहा वर्षात सर्वाधिक 'वृक्षसंहार', शेतजमिनींचादेखील ऱ्हास; केंद्रीय अहवालातून खुलासा!

SCROLL FOR NEXT