Temperature to rise in Goa | Goa Weather Update Dainik Gomantak
गोवा

Goa Weather: गोव्यात कमाल तापमानात घट; थंडीचा प्रभाव मंदावला! पुढील 48 तासांत कसे राहणार हवामान? वाचा

Goa Temperature: राज्यात कमाल तापमानाचा पारा ३५ अंशांपर्यंत पोहोचला होता. आता त्यात घट होऊन कमाल तापमान ३३.२ अंश सेल्सिअसवर पोहोचले आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

Goa temperature update today

पणजी: राज्यात मागील आठवड्याभरापासून वाढलेल्या तापमानाच्या पाऱ्यात काही अंशी घट झाली आहे. राज्यात कमाल तापमानाचा पारा ३५ अंशांपर्यंत पोहोचला होता. आता त्यात घट होऊन कमाल तापमान ३३.२ अंश सेल्सिअसवर पोहोचले आहे. मात्र, सामान्य तापमानाच्या तुलनेत काही अंश अधिक आहे.

त्यासोबतच किमान तापमानात मात्र मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. किमान तापमान २४ अंश सेल्सिअस पोहोचले असून सामान्य तापमानाच्या तुलनेत तब्बल ३.४ अंश सेल्सिअसने वाढ झाली आहे. मागील आठवड्यापासून काही अंशी थंडीचा प्रभाव दिवसेंदिवस ओसरत असून ऋतुबदलाचे संकेत दिसून येत आहेत.

सर्वसमान्यपणे फेब्रुवारी मध्यानंतर राज्यात थंडीचा प्रभाव कमी होत जातो व नंतर हळू-हळू उष्म्याच्या झळा वाढू लागतात. आता एकंदरीत उष्म्याचा प्रभाव वाढत असल्याचे दिसून आलेअसून पुढील ४८ तासांत राज्यातील कमाल व किमान तापमान ३४ व २२ अंश सेल्सिअस असण्याची शक्यता गोवा वेधशाळेद्वारे वर्तविण्यात आली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

"आखातातील गोवेकरांसाठी सावंत सरकार आलं धावून'' सरदेसाईंच्या धारदार सवालावर मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत स्पष्टचं सांगितलं

International Women's Day 2026: न्यू यॉर्कमध्ये रंगला आंतरराष्ट्रीय महिला दिनाचा सोहळा, कर्तृत्ववान भारतीय महिलांचा 'गौरव'

Gold Market Value: "युद्धामुळं सोनं झालं पॉवरफुल''! 35 ट्रिलियन डॉलर्सवर पोहोचलं बाजारमूल्य; भारत आणि ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेलाही सोडलं मागं

Oldest Photograph Of Goa: गोव्यातलं सर्वात जुनं छायाचित्र कोणतं? सोशल मीडियावर रंगली चर्चा; 1855 सालच्या फोटोनं वेधलं लक्ष

VIDEO: "मध्यपूर्वेतील युद्धाचा भडका आणि भारताची धाकधूक'' जयशंकर यांनी व्यक्त केली मोठी चिंता; भारतीयांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य

SCROLL FOR NEXT