Goa Government | CM Pramod Sawant Dainik Gomantak
गोवा

Pramod Sawant Statement: पारदर्शकपणे भरती प्रक्रिया केली जाईल ; परीक्षा देण्याची गरज भासणार नाही

Pramod Sawant Statement: जानेवारीपासून कर्मचारी निवड आयोगाद्वारे नोकरभरती

दैनिक गोमन्तक

Pramod Sawant Statement: आमचे सरकार राज्यातील प्रत्येक तरुणाला रोजगार मिळावा, यासाठी प्रयत्नशील आहे. यापुढे सरकारी नोकरीसाठी वेगवेगळे अर्ज, परीक्षा देण्याची गरज भासणार नाही. कोणाच्याही वशिल्याविना, आमदार-मंत्र्यांकडे न जाता पारदर्शकपणे भरती प्रक्रिया केली जाईल.

जानेवारीपासून कर्मचारी निवड आयोगाद्वारे केवळ वर्षातून एकदा परीक्षा घेऊन नोकर भरती केली जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केली.

राजभवन येथील दरबार हॉलमध्ये आयोजित रोजगार मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे, मंत्री रवी नाईक, सुभाष शिरोडकर, बाबूश मोन्सेरात, नीलेश काब्राल, नीळकंठ हळर्णकर, सुभाष फळदेसाई, आमदार प्रेमेंद्र शेट, मुख्य सचिव पुनित गोयल उपस्थित होते.

वर्षाला एकदाच परीक्षा

राज्यातील विविध खात्यांच्या वेगवेगळ्या पदांसाठी वेगवेगळे अर्ज येतात. शिपाई पदासाठी 5 हजार अर्ज, कारकून पदासाठी 10 हजार अर्ज, वेगवेगळ्या परीक्षा, त्यासाठी पुन्हा-पुन्हा अर्ज करावे लागतात.

काहीजण आमदारांकडे जातात. ही वेळ गोव्यातील तरुणांवर येऊ नये, यासाठी शिपायापासून कारकुनापर्यंत सर्व पदांसाठी वर्षातून एकच परीक्षा घेण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.

नियुक्तीपत्रे दिलेल्यांची खातेवार आकडेवारी

  • पोलिस - 900

  • अग्निशमन - 189

  • कृषी - 59

  • नियोजन आणि सांख्यिकी - 54

  • नदी परिवहन - 11

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Highway: जमिनी गेल्या, रस्ताही अडला; उगवेकरांचा संताप, एनएच 66 मुळे दैनंदिन जीवन विस्कळीत; मोबदल्याची अद्याप प्रतीक्षा

Bicholim Hit And Run Case: सुरक्षेचा 'तिसरा डोळा' ठरला कर्दनकाळ; अपघातानंतर पळणाऱ्या चालकाच्या मुसक्या आवळल्या, डिचोली पोलिसांची कारवाई

"वाघांचे मृत्यू अन् वन विभागाचे अपयश"; पर्यावरणप्रेमी राजेंद्र केरकर यांचा थेट प्रहार!

Goa Crime: काकाची हत्या करून मावशीकडे घेतला आश्रय! बोरी येथील दीपक नाईक हत्या प्रकरणातील संशयित नराधम पोलिसांच्या तावडीत

Goa Accident: अटल सेतूवर विचित्र अपघात! 1 नाही, 2 नाही... 7 गाड्या एकमेकांना धडकल्या, वाहतूक विस्कळीत; Watch Video

SCROLL FOR NEXT