Goa Congress  Dainik Gomantak
गोवा

Goa Congress : विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Congress : सरकारपक्षाने गेंड्याचे कातडे पांघरल्याने त्यांना काही पडलेले नसून मुद्देसूद, सविस्तर उत्तरे न देता विरोधकांना जनतेचे प्रश्‍न मांडण्यासाठी अधिक वेळ मिळू नये यासाठी प्रयत्न केले जात आहेत, अशी घणाघाती टीका काँग्रेसचे आमदार कार्लुस अल्वारिस फेरेरा यांनी केली. ‘गोमन्तक टीव्ही’वरील संपादक संचालक राजू नायक यांनी घेतलेल्या विशेष मुलाखतीत ते बोलत होते.

विधानसभेत अभ्यासपूर्ण चर्चा होणे अपेक्षित आहे, परंतु सद्यःस्थितीत चर्चांचा स्तर खालावला असून जाणीवपूर्वक वेळ मारून नेण्‍याचा प्रयत्न केला जात आहे, असेही ते म्हणाले.

विरोधी पक्षांच्या आमदारांची एकजूट आहे. आम्ही बैठका घेऊन विधानसभेत कोण काय बोलणार हे ठरवले आहे. जनतेचे विविध प्रश्‍न मांडण्यासाठी एकत्रितपणे व्यूहरचना आखली आहे आणि त्याप्रमाणे विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात विविध प्रश्नांचा भडिमार करून सरकारला घेरले जात आहे.

विरोधक एकत्र असल्याने सरकार घाबरत असून येत्या काळात विरोधक जनतेच्या प्रश्‍नांसाठी सरकारविरोधात अधिक भक्कमपणे उभे राहिलेले आपल्याला पाहायला मिळेल, असेही त्यांनी सांगितले.

सरकारने अर्थसंकल्पात 1 हजार कोटी खाण व्यवसायातून मिळणार असल्याचे म्हटले आहे, परंतु तसे काही होणार नसून सरकारने वेगळे पर्याय शोधणे गरजेचे आहे. अजून अनेक परवानग्या मिळणे बाकी असून त्या वर्षभरात मिळतील असे मला वाटत नाही. त्यामुळे वर्षभरात खाणी सुरू होणार नाहीत हे निश्चित आहे, असे ते म्हणाले.

‘सभापती तवडकरांना मर्यादा’

सभापती रमेश तवडकर चांगले आहेत, परंतु सभापतिपदी असल्याने त्यांना अनेक मर्यादा आहेत. सरकार पक्ष अडचणीत येतोय असे समजताच त्यांना काहीवेळा विरोधकांना थांबवावे लागते, परंतु काही प्रश्‍न जे त्यांना महत्त्वाचे वाटतात, त्या प्रश्‍नांवेळी ते बोलण्यास मुभाही देत असल्याचे कार्लुस फेरेरा यांनी सांगितले.

‘मणिपूर जळतोय, केंद्र सरकार गप्प’

५ मे पासून मणिपूर जळतोय, परंतु त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. मणिपूरमध्ये भाजपचे सरकार असल्याने गप्प आहेत. पंतप्रधान मणिपूर जळत असताना अमेरिकेत जातात. वेगवगेळ्या देशांचे दौरे करतात.

बीबीसीच्या माहितीपटावर बंदी घालण्याचा प्रयत्न करत आहेत.त्याला आम्ही विधानसभेत देखील आज विरोध केला. सरकार सत्यता दाबू पाहात आहे. या घटनांवर केंद्र सरकार असंवेदनशील असल्याचे दिसून येत असल्याचे फेरेरा यांनी सांगितले.

‘...या लज्जास्पद घटना’

कला अकादमीसंदर्भात सरकारने विधानसभा सुरू असतानाच श्‍वेतपत्रिका सादर करणार असल्याचे सांगितले आहे. सरकार केवळ डोळ्यांना पाणी पुसण्याचा प्रयत्न करत असून या श्‍वेतपत्रिकेद्वारे आमचे समाधान न झाल्यास आम्ही शांत बसणार नाही. आम्ही आमच्या पद्धतीने प्रयत्न करू.

कला अकादमीचे छत कोसळणे, गांजे येथे नव्याने उभारणी केलेल्या पंपाचे वाहून जाणे, स्मार्ट सिटी तसेच इतर घटनांमधून सरकार सक्षम नसल्याचे दिसून येत असून या घटना राज्यासाठी लज्जास्पद असल्याचे फेरेरा यांनी सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Subhash Velingkar: सुभाष वेलिंगकरांची अटक अटळ? कोर्टाचा दिलासा नाही, जामीन अर्जावर सोमवारी सुनावणी

Saint Francis Xavier: सुभाष वेलिंगकरांच्या अटकेसाठी उद्रेक; पर्यटक, विद्यार्थ्यांचे हाल, गोव्यात दिवसभर कुठे काय घडलं?

BKC ते आरे JVLR पंतप्रधान मोदींचा मेट्रोने प्रवास; शाळकरी विद्यार्थी, महिलांशी साधला संवाद पाहा Video

Goa HSE Board Exam: गोवा बारावी बोर्ड परीक्षेच्या वेळापत्रकात बदल, JEE परीक्षेमुळे मोठा निर्णय

गिरीत बंदिस्त खोलीत आढळला मृतदेह , संशयास्पद मृत्यूचा कुटुंबियांचा अंदाज; गोव्यातील ठळक बातम्या

SCROLL FOR NEXT