Goa Liberation Day Dainik Gomantak
गोवा

Goa Liberation Day: 'ऑपरेशन विजय'च्या शूरवीरांना सलाम! राष्ट्रपती, पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांसह अनेक नेत्यांकडून 'गोवा मुक्ती दिना'च्या शुभेच्छा

Goa Liberation Day: भारताच्या इतिहासात १९ डिसेंबर हा दिवस सुवर्ण अक्षरांनी लिहिला गेला आहे. १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारत स्वतंत्र झाला असला, तरी गोव्याच्या भूमीवर पोर्तुगीजांचे वर्चस्व कायम होते.

Sameer Amunekar

पणजी: भारताच्या इतिहासात १९ डिसेंबर हा दिवस सुवर्ण अक्षरांनी लिहिला गेला आहे. १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारत स्वतंत्र झाला असला, तरी गोव्याच्या भूमीवर पोर्तुगीजांचे वर्चस्व कायम होते. तब्बल १४ वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर आणि सशस्त्र क्रांतीनंतर १९६१ मध्ये गोवा मुक्त झाला. आज या ऐतिहासिक घटनेला ६४ वर्षे पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने, संपूर्ण देशभरातून गोमंतकीय जनतेवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी या दिनाचे महत्त्व अधोरेखित करत हुतात्म्यांना आदरांजली वाहिली आहे.

गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी राज्याच्या जनतेला संबोधित करताना 'गोवा मुक्ती दिन' हा केवळ उत्सवाचा दिवस नसून तो आत्मचिंतनाचा दिवस असल्याचे सांगितले. "हा दिवस गोव्याच्या अस्मितेचा आणि संघर्षाचा विजय आहे. आपल्या पूर्वजांनी ४५० वर्षांची पोर्तुगीज राजवट उलथवून लावण्यासाठी जे रक्त सांडले, त्याचे ऋण आपण कधीही विसरू शकत नाही," अशा शब्दांत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. राज्य सरकार गोव्याची प्रतिष्ठा, एकता आणि सांस्कृतिक वारसा जपण्यासाठी कटिबद्ध असून, प्रत्येकाने राज्याच्या प्रगतीत योगदान द्यावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

पंतप्रधान मोदींकडून सैनिकांचे स्मरण

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून गोव्याच्या स्वातंत्र्यलढ्यातील नायकांना सलाम केला. "गोवा मुक्ती दिन हा भारताच्या राष्ट्रीय प्रवासातील एक निर्णायक अध्याय आहे. अन्याय सहन न करता धैर्याने लढणाऱ्या त्या अदम्य भावनेचे आम्ही स्मरण करतो. गोव्याच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांचे बलिदान आम्हाला सदैव प्रेरणा देत राहील," असे पंतप्रधानांनी आपल्या संदेशात नमूद केले. गोव्याने गेल्या काही वर्षांत पर्यटनासोबतच पायाभूत सुविधांमध्ये केलेली प्रगती ही वाखाणण्याजोगी असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

सशस्त्र दलांच्या शौर्याला राष्ट्रपतींचा सलाम

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी गोव्याच्या मुक्तीसाठी राबवलेल्या 'ऑपरेशन विजय' मधील भारतीय सशस्त्र दलांच्या कामगिरीचा गौरव केला. वसाहतवादी राजवटीतून गोव्याला मुक्त करण्यासाठी ज्या शूरवीरांनी प्राणांची आहुती दिली, त्यांच्याबद्दल राष्ट्र कृतज्ञता व्यक्त करत असल्याचे त्यांनी म्हटले. गोव्याचे भविष्य अधिक उज्ज्वल आणि समृद्ध होवो, अशी इच्छाही त्यांनी व्यक्त केली.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी या दिनाचे ऐतिहासिक महत्त्व सांगताना आजच्या पिढीला एका महत्त्वाच्या वास्तवाची जाणीव करून दिली. ते म्हणाले की, "१९६१ पर्यंत भारतीयांना आपल्याच देशातील गोव्यात जाण्यासाठी परवानगी घ्यावी लागत होती, ही बाब आजच्या तरुणाईला कदाचित ठाऊक नसेल." प्रभाकर वैद्य, नानाजी देशमुख आणि जगन्नाथ राव जोशी यांच्यासारख्या महान नेत्यांनी या अन्यायाविरुद्ध आवाज उठवला. त्यांच्या संघर्षामुळेच आज गोवा भारताचा अविभाज्य भाग आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: व्हायरल होण्यासाठी काहीही? भर बाजारात तरूणीचा टॉवेलवर डान्स! नेटकरी भडकले

Goa Crime: सॅम्युअलचा बळी नक्की कोणामुळे?यंत्रणेवरच्या विश्‍वासाचा 'कचरा'!

Goa Water Crisis: चिखली-कोलवाळ परिसरात तीव्र पाणीटंचाई; ग्रामस्थ संतप्त, पाणीपुरवठा विभागाकडून नवीन जलवाहिनीचे काम सुरू

सॅम्युअलवर शोकाकुल वातावरणात अंत्यसंकार, कुटुंबीयांनी अखेर मृतदेह स्वीकारला; पोलिसांच्या 'FIR'वर कार्लोस फेरेरा यांचे प्रश्नचिन्ह

Ujjwala Yojna New Rules: सर्वसामान्यांना मोठा धक्का! उज्ज्वला गॅस योजनेत मोठा बदल; आता वर्षभरात मिळणार फक्त 'इतके' सिलिंडर

SCROLL FOR NEXT