Goa Budget Session 2025 Dainik Gomantak
गोवा

Goa Budget Session 2025: कोणत्या क्षेत्राला काय मिळणार? 24 मार्चपासून सुरु होणार गोव्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन

Goa Legislative Assembly Budget Session 2025: सरकारने बोलवलेल्या तीन दिवसीय अधिवेशनावरुन विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी टीका केली आहे.

Pramod Yadav

Goa Assembly Budget Session 2025:

पणजी: गोवा सरकारने अर्थसंकल्पीय अधिवेशनाची घोषणा केली आहे. २४ मार्चपासून तीन दिवस हे अर्थसंकल्पीय अधिवेशन चालणार आहे. काही दिवसांपूर्वी विधानसभेचे दोन दिवसांचे हिवाळी अधिवेशन पार पडले. त्यानंतर आता महत्वाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

अर्थसंकल्पीय अधिवेशनात कोणत्या क्षेत्राला काय मिळणार? याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई यांनी तीन दिवसांचे अर्थसंकल्पीय अधिवेशन बोलवले आहे. २४, २५ आणि २६ मार्च असे तीन दिवस हे अधिवेशन होणार आहे. २६ मार्च रोजी राज्याच अर्थसंकल्प जाहीर केला जाणार आहे.

विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी अधिवेशनाच्या कालावधीवरुन सरकारवर टीका केली आहे. "तीन दिवसांचे अधिवेशन बोलवून पक्ष (भाजप) विरोधकांना घाबरत असल्याचे दिसून येते. लोकशाहीच्या मूल्यांना डावलण्याचा प्रयत्न केला आहे. भाजप हुकूमशाही सामाजिक कार्यकर्त्यांना तुरुंगात टाकून त्यांचा आवाज दाबत आहे", असे आलेमाव यांनी म्हटले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

शनि आणि गुरुची चाल करणार मालामाल! नव्या वर्षात खुले होणार उत्पन्नाचे नवे मार्ग, 2026 मध्ये 'या' राशींना मिळणार धनकमाईच्या सुवर्णसंधी

Bodgeshwar Jatra: म्हापशात प्रशासनाचा बडगा! श्री बोडगेश्वर जत्रोत्सवातील जायंट व्हील्ससह 20 राईड्स सील; सुरक्षेच्या कारणास्तव मोठी कारवाई

पिढ्यांमधील अंतर आणि मनाचा समतोल: सुखी म्हातारपणाची गुरुकिल्ली

लग्नाच्या मांडवात राडा! नवऱ्या मुलाला किस करणाऱ्या 'एक्स'ला नवरीनं भर मंडपात धोपटलं; सोशल मीडियावर व्हिडिओ तुफान व्हायरल

India Pakistan Nuclear List: तणावाच्या वातावरणातही भारत-पाकिस्तानने जपली 35 वर्षांची परंपरा; अणुयादीच्या देवाणघेवाणीने जगाचे वेधले लक्ष

SCROLL FOR NEXT