पणजी : राज्यात उन्हाळ्याची तीव्रता वाढत असल्याचे चित्र एप्रिलच्या सुरुवातीलाच स्पष्ट झाले आहे. एप्रिल महिन्याच्या पहिल्याच दिवशी कमाल तापमान थेट ३५.२ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचल्याने नागरिकांना उकाड्याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
यासोबतच किमान तापमानही २६.६ अंशांवर नोंदवले गेले असून, दिवस-रात्र दोन्ही वेळच्या तापमानात वाढ झाल्याने वातावरण अधिकच दमट व उष्ण झाले आहे. वेधशाळेने दिलेल्या माहितीनुसार, पुढील दोन दिवसांत काही भागांत तुरळक पावसाची शक्यता आहे.
या पावसामुळे उकाड्यात काही प्रमाणात दिलासा मिळू शकतो, मात्र तापमान ३३ ते ३४ अंशांच्या दरम्यानच राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे उष्णतेचा प्रभाव कायम राहण्याची शक्यता आहे. दरम्यान, वाढत्या उष्म्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी योग्य ती काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
दुपारच्या वेळेत शक्यतो घराबाहेर पडणे टाळावे, पुरेसे पाणी पिणे, हलके व सैल कपडे परिधान करणे तसेच उष्माघातापासून बचावासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, असे आरोग्य तज्ज्ञांनी सांगितले आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.