Goa Water Tariff Hike Dainik Gomantak
गोवा

Goa Water Tariff Hike: गोयंकार पाणी बिल महागले! सर्व प्रकारच्या पाणी बिलात 5 टक्के वाढ

आता प्रत्येक आर्थिक वर्षाच्या सुरवातीला होणार पाणी बिलात वाढ

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Water Tariff Hike: गोवा सरकारने गांधी जंयती दिवशी महत्वाचा निर्णय घेतला आहे. एक ऑक्टोबर पासून राज्यात पाच टक्के पाणी बिलात वाढ करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. सर्व प्रकारच्या पाणी बिलात ही वाढ होणार असल्याचे सरकारने म्हटले आहे. तसेच, यापुढे प्रत्येक आर्थिक वर्षाच्या सुरूवातीला पाणी बिलात वाढ होणार आहे. यामुळे आता सामान्य नागरिकांच्या खिशाला वाढीव बिलाची झळ बसणार आहे.

सरकारच्या पाणी बिल वाढीच्या निर्णयावर आता विविध प्रतिक्रिया यायला लागल्या आहेत. गोवा फॉरवर्डचे आमदार विजय सरदेसाई (MLA Vijay Sardesai) यांनी सरकारच्या निर्णयावर टीका करत

विधानसभा निवडणूकीपूर्वी भाजप आणि प्रमोद सावंत (Pramod Sawant) यांनी गोव्यातील जनतेला प्रत्येक घरात 16 हजार लिटर पाणी मोफत मिळेल असे सांगितले होते. याचा उल्लेख त्यांच्या जाहीरनाम्यात देखील करण्यात आला आहे. भाजप (BJP) सरकार स्थापन झाल्यानंतर सहाच महिन्यात याच सरकारने आपल्या वचनावर पलटी मारली आहे. आणि पाणी बिलात वाढ केली आहे. भाजपला मते केले म्हणून पाणी बिल वाढ करून त्यांना दंड केला आहे. अशी टीका गोवा फॉरवर्डचे आमदार विजय सरदेसाई यांनी केली.

आमदारांना विकत घेण्यासाठी आलेला खर्च सरकार गरिब जनतेकडून वसूल करत आहे का प्रश्न देखील गोमंतकीयांना पडला आहे. त्यामुळे गोव्याच्या जनतेला माझी विनंती आहे की जागे व्हा. दिवसेंदिवस भाजप सरकार तुम्हाला कसे फसवत आहे. याची जाणीव लोकांना व्हायला पाहीजे असेही विजय सरदेसाई म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Crime News: माहेरी गेलेली बायको परत आली नाही, नैराश्यातून तीन पोरींचा जीव घेऊन स्वतःला संपवलं; सुधाकरनं ओलांडली 'क्रूरतेची सीमा'

PM Kisan Nidhi 23rd Installment: पीएम किसानचा 2,000 रुपयांचा हप्ता उद्या खात्यात! यादीत नाव नसल्यास पैसे अडकू शकतात, आत्ताच अशी करा पडताळणी

Goa Development: गोव्यासाठी दिल्लीतून सुटला तब्बल 2000 कोटींचा निधी! केंद्र आणि राज्य सरकार मिळून गोव्याचा चेहरामोहरा बदलणार; कामतांचा विश्वास

Goa Tourism: 'पर्यटनात विविधता, कुशल मनुष्यबळ निर्मितीवर सरकारचा भर', राज्यात 5 नवीन महाविद्यालयांची मुख्यमंत्र्यांकडून घोषणा

Goa Water Crisis: "गोव्यातील पाणीटंचाईला सावंत सरकारच जबाबदार", युरी आलेमाव यांचा हल्लाबोल

SCROLL FOR NEXT