Goa Water Conservation Dainik Gomantak
गोवा

Goa Water Conservation: गोव्यात पाण्याची मोठी चिंता! 30 सप्टेंबरपर्यंत 500 बंधाऱ्यांचे दरवाजे बंद करण्याचा सरकारचा निर्णय; जलसंवर्धनासाठी उचलली पावले

Goa Rainfall Deficit 2026: यंदा पावसाची मोठी तूट राहिल्याने पाणी संवर्धनासाठी ३० सप्टेंबरपर्यंत राज्यातील सुमारे ५०० बंधाऱ्यांचे दरवाजे बंद करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे,

गोमंतक ऑनलाईन टीम

सासष्टी: यंदा पावसाची मोठी तूट राहिल्याने पाणी संवर्धनासाठी ३० सप्टेंबरपर्यंत राज्यातील सुमारे ५०० बंधाऱ्यांचे दरवाजे बंद करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे, अशी माहिती जलसंपदा मंत्री सुभाष शिरोडकर यांनी दिली.

सप्टेंबरच्या पहिल्या १२ दिवसांत राज्यात केवळ ८३ मिमी पाऊस झाला असून, देशात सध्या २८ टक्के पावसाची तूट आहे. गोव्यातील तूट त्याहून अधिक असल्याने सरकारने या परिस्थितीची गंभीर दखल घेतली आहे. गणेश चतुर्थीनंतर एक-एक करून बंधाऱ्यांचे दरवाजे बंद केले जातील. जलस्रोत खात्यातील अधिकाऱ्यांना २२ सप्टेंबर रोजी यासंदर्भात आदेश दिले जातील.

नासाडी टाळण्यासाठी काळजी घ्या : शिरोडकर

यंदा कमी पाऊस झाल्याची दखल नागरिकांनीही घेतली पाहिजे. पाण्याची नासाडी टाळण्यासाठी प्रत्येकाने काळजी घ्यावी, असे आवाहन शिरोडकर यांनी केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘पाणी वाचवा’ मोहीम सुरू केली असून, राज्यात पाणी संवर्धनाच्या बाबतीत कोणतीही तडजोड केली जाणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ganeshotsav 2026: गोव्यात गणेशोत्सवाचा जल्लोष सुरू! अंगणात सडा, दाराशी रांगोळी अन् माटोळीची सजावट; बाप्पाच्या आगमनाने चैतन्याला उधाण

Horoscope 14 September 2026: गणपती बाप्पा मोरया...! बाप्पाच्या कृपावर्षावानं 'या' राशी होणार मालामाल; कुबेराचा खजिना उघडणार

Sant Dnyaneshwari Philosophy: 'ज्ञानेश्वरी' आजही जीवनाचा शाश्वत दीपस्तंभ! कृत्रिम बुद्धिमत्ता, तणाव आणि वेगवान जीवनशैलीच्या युगात विवेक, करुणा अन् संतुलनाचा मार्ग

Goa Cricket: गोवा क्रिकेट संघाची बहरीनवारी होणार? क्रिकेट विकासासाठी सामंजस्य कराराची चर्चा; मन्सूर यांनी दिले गोवा संघाला बहरीन भेटीचे निमंत्रण

9/11 हल्ल्याच्या आधी 'भारत' होता लादेनच्या टार्गेटवर! CIAच्या सीक्रेट रिपोर्टमध्ये खळबळजनक खुलासा; अल-कायदाचा जागतिक विनाशाचा मास्टरप्लॅन

SCROLL FOR NEXT