पणजी: मासेमारीवरील दोन महिन्यांची वार्षिक बंदी उठविण्यात आली असली, तरी स्थलांतरित कामगारांच्या कमतरतेमुळे गोव्यातील मासेमारी व्यवसायाला अपेक्षित वेगाने सुरुवात होण्याची शक्यता कमी आहे.
पूर्वोत्तर राज्यांमध्ये निर्माण झालेल्या नैसर्गिक आपत्तीमुळे तेथून येणाऱ्या कामगारांच्या आगमनाला विलंब होत असून, त्यामुळे अनेक बोटी अद्याप किनाऱ्यावरच थांबून आहेत.
ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला गोव्यातील मासेमारी व्यवसायासाठी आवश्यक असलेला मोठा कामगार वर्ग उत्तरपूर्व राज्यांतून येतो. यंदा मात्र त्या भागातील पूरस्थिती आणि वाहतूक विस्कळीत झाल्यामुळे कामगार वेळेवर परतण्याबाबत अनिश्चितता निर्माण झाली आहे.
परिणामी, बोटमालकांनी नवीन हंगामासाठी सर्व तयारी पूर्ण केली असली, तरी कामगार उपलब्ध झाल्यानंतरच बोटी समुद्रात उतरविणे शक्य होणार आहे. कामगारांच्या टंचाईबरोबरच समुद्रातील प्रतिकूल हवामान हेही सध्या मासेमारी व्यवसायापुढील एक मोठे आव्हान ठरत आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.