येत्या एक-दोन दिवसात धरणातून जलविसर्ग अटळ असल्याचे संकेत मिळत आहेत. त्यामुळे शापोरा नदीकाठी भिती पसरली आहे.  Dainik Gomantak
गोवा

Goa: तिलारी धरणातून पुढील दोन दिवसांत पाण्याचा विसर्ग अटळ

113.20 मीटर ही धरणातील जलसाठ्याची पातळी आहे. रविवारपर्यंत या धरणातील जलसाठ्याची पातळी 109 मीटरहून अधिक वाढली आहे.

दैनिक गोमन्तक

डिचोली: मुसळधार पावसामुळे (Rain) महाराष्ट्रातील तिलारी धरणाची (Tilari Dam) पातळी वाढत असली, तरी अद्याप जलसाठ्याने धोक्याची पातळी (Level of danger) गाठली नसल्याची माहिती मिळाली आहे. धरण प्रकल्प अधिकारीणीने अद्याप धोक्याचा 'अलर्ट' (Danger 'alert') दिला नसला, तरी पावसाचा जोर पाहता धरणातून मोठ्या प्रमाणात जलविसर्गाचा धोका वाढला आहे. रविवार प्रमाणेच उद्यापर्यंत पावसाचा जोर कायम राहिल्यास येत्या एक-दोन दिवसात धरणातून जलविसर्ग अटळ असल्याचे संकेत मिळत आहेत. त्यामुळे शापोरा नदीकाठी भिती पसरली आहे.

113.20 मीटर ही धरणातील जलसाठ्याची पातळी आहे. रविवारपर्यंत या धरणातील जलसाठ्याची पातळी 109 मीटरहून अधिक वाढली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, धरणातील पातळी नियंत्रीत ठेवण्यासाठी आणि जलविसर्गाचा धोका टाळण्यासाठी धरणातील अतिरिक्त पाणी बाहेर सोडण्याचा निर्णय धरण प्रकल्प अधिकारीणीने घेतला असल्याची माहिती मिळाली आहे.

शापोरा तुडूंब

तिळारी धरणात जलविसर्ग सुरु झाला की अतिरिक्त पाणी शापोरा नदीत सोडण्यात येते. त्यामुळे शापोरा नदीच्या पाण्याची पातळी झपाट्याने वाढते. सद्यस्थितीत मुसळधार पावसामुळे साळ, मेणकूरेहून वाहणारी शापोरा नदी तुडूंब भरली आहे. त्यामुळे नदीकाठी भिती पसरली आहे. मागील जून महिन्यात 'तिळारी'तील पाण्याने शिखर स्तर गाठल्यानंतर पाणी बाहेर गोव्याच्या दिशेने वाहणाऱ्या शापोरा नदीत वाहू लागले होते. जलनिसर्गाचा धोका ओळखून त्यावेळी शापोरा नदीकाठच्या जनतेला सतर्कतेचा इशारा देण्यात आला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics: "एनडीएला बळ देण्यासाठीच प्रवेश", 7 खासदारांच्या पक्षांतरावर कीर्तीकरांचे विधान

Padma Shri Prasad Sawkar: आठवणीत वसलेले प्रसाद सावकार

आगामी निवडणुकांमध्ये तरुणांसह महिलांना देणार संधी! 'जेनझी'शी राजकीय 'कनेक्ट' गरजेचा- विजय सरदेसाई

Goa Politics: भाजप सरकारचा अहंकार जनता मोडेल! अरविंद केजरीवालांची टीका, कारापूर आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतल्याचा केला निषेध

Section 39A Protest: आता गावागावांतून आंदोलन! कलम '39अ'विरोधात आमदार वीरेश बोरकर यांची घोषणा

SCROLL FOR NEXT