crime in Goa Dainik Gomantak
गोवा

Goa Crime: कमिशन न मिळाल्याने गाडीला आग? शिरवईतील घटनेने खळबळ; पोलीस तपास सुरू

Car Burning Incident: घरात कोणीही नसताना एका अज्ञात व्यक्तीने कमिशन न मिळाल्याने ही आग लावली असल्याचा संशय जाफर यांनी व्यक्त केला आहे

Akshata Chhatre

शिरवाई: मध्यरात्री एक अज्ञात व्यक्तीने दक्षिण गोव्यातील शिरवई या भागातील जाफर नावाच्या एका स्थानिकांच्या ओम्नी मारुती गाडीला आग लावली. या घटनेमुळे जाफर यांचे जवळपास अठरा हजारांचे नुकसान झाले आहे. घरात कोणीही नसताना एका अज्ञात व्यक्तीने कमिशन न मिळाल्याने ही आग लावली असल्याचा संशय जाफर यांनी व्यक्त केला आहे.

काय आहे एकूण घटना?

शिरवई येथील पेडामोळ भागात राहणाऱ्या जाफर नावाच्या इसमाच्या ओम्नी मारुती गाडीला शुक्रवारी (दि.७) रोजी एका अज्ञात माणसाने आग लावली. या आगीमुळे गाडी संपूर्णपणे जळून खाक झाली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, दक्षिण गोव्यातील शिरवई येथील जाफर नावाच्या या इसमाचा मसाल्याचा व्यवसाय आहे आणि या व्यवसायानिमीत्तच तो बाहेरगावी गेला होता.

त्याच्या अनुपस्थितीत एका अज्ञाताकडून घरभर असलेल्या गाडील आग लावण्यात आली. जाफरने दिलेल्या माहितीनुसार गाडी बाहेर बंद ठेवण्यात आली होती आणि संशयिताकडून मुद्दामून गाडी उघडून आग लावण्यात आलीये. घराचा दरवाजा देखील आगीने जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला.

कमिशन न नुकसान करावल्याचा संशय

जाफर यांनी माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार सध्या ते राहत असलेलं घर त्यांनी अलीकडेच विकत घेतलं आहे आणि यापूर्वी ते भाडेकरू म्हणून रहायचे. घर विकत घेतल्यानंतर त्यांना एका माणसाकडून सतत कमिशन मागण्यासाठी धमक्या दिल्या जायच्या आणि याच भावनेतून गाडीला देखील आग लावली असल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला आहे. जाफर यांच्या अनुपस्थितीत त्यांच्या भावोजींकडून रात्री आग विझवण्यात आली होती, तसेच त्यांनी पोलिसांमध्ये तक्रार देखील नोंदवल्याने पोलीस पुढील तपास करत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Virat Kohli: 'किंग'चा लाजिरवाणा कमबॅक: 7 महिन्यांनी परतला, पण फक्त 8 चेंडू खेळून 'शून्य'वर बाद; लज्जास्पद विक्रमाची नोंद VIDEO

कणखर गृहमंत्री ते संवेदनशील कृषीमंत्री: रवी नाईक यांच्या व्यक्तिमत्त्वाचं मुख्यमंत्री फडणवीसांकडून गौरवोद्गार

Ravi Naik: 'मी फक्त पुढे, सेनापती मात्र रवीच'; दिवंगत नेत्याला भावनिक आदरांजली

Horoscope: 71 वर्षांनंतर महासंयोग! यंदाची दिवाळी 5 शुभ योगांची, 'या' राशींचे भाग्य उजळणार; शुभ कार्यांसाठी सर्वोत्तम काळ

1310-1312 मध्ये अल्लाउद्दीन खिलजीच्या मोठ्या सैन्याने कोकणात प्रवेश केला, कदंबांची गोव्यातील राजधानी गोपकपट्टणाचा नाश केला..

SCROLL FOR NEXT