CM Pramod Sawant And DCM Tejaswi Yadav Dainik Gomantak
गोवा

'भाजपला बिहारचा एवढा द्वेष का'? CM सावंत यांच्या वक्तव्यावरून बिहारमध्ये राजकारण तापले, वाचा कोण काय म्हणाले?

गोव्याचे प्रमोद सावंत यांचे बिहारींबद्दलचे वक्तव्य बिहारी अभिमानाला धक्का लावण्यासारखे आहे. या विधानाबद्दल त्यांनी माफी मागितली पाहिजे. अशी मागणी जेडीयूने केली आहे.

Pramod Yadav

Tejaswi Yadav on CM Pramod Sawant: गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी यूपी आणि बिहारमधील स्थलांतरित मजुरांबाबत केलेल्या वादग्रस्त विधानानंतर बिहारमध्ये राजकारण चांगलेच तापले आहे.

'केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांच्यानंतर आता गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी लाजीरवाणे वक्तव्य करून बिहार आणि बिहारी लोकांचा अपमान केला आहे.' असे ट्विट राज्याचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी केले.

तसेच, 'भाजप आणि भाजप नेते बिहार आणि बिहारी लोकांचा एवढा द्वेष का करतात?' असा सवालही तेजस्वी यादव यांनी उपस्थित केला आहे.

गोव्याच्या मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी काही दिवसांपूर्वी, राज्यातील जवळपास 90 टक्के गुन्हे हे बिहार, उत्तर प्रदेश आणि परराज्यातील स्थलांतरित मजुरांकडून केले जातात. असे वक्तव्य केले होते. त्यानंतर बिहारमधून सावंत यांच्या वक्तव्याबद्दल टीका केली जात आहे.

दरम्यान, याप्रकरणी बिहारच्या पटना न्यायालयात त्यांच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. मनीष सिंह यांनी ही तक्रार दाखल केली आहे.

सावंत यांच्या वक्तव्यावरून बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव आक्रमक झाले आहेत. त्यांनी याबाबत ट्विट करत मुख्यमंत्री सावंत आणि भाजपवर टीका केली याहे.

काय म्हणाले उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव?

"केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांच्यानंतर आता गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी लाजीरवाणे वक्तव्य करून बिहार आणि बिहारी लोकांचा अपमान केला आहे. भाजप आणि भाजप नेते बिहार आणि बिहारी लोकांचा द्वेष का करतात? केंद्रातील भाजप सरकार बिहारच्या सर्व हक्क, वाजवी मागण्या आणि हक्कांबाबत नेहमीच नकारात्मक आणि उदासीन का असते?" असे ट्विट तेजस्वी यादव यांनी केले आहे.

जेडीयूचे प्रवक्ते नीरज कुमार यांनीही प्रमोद सावंत यांच्या वक्तव्याचा तीव्र शब्दात निषेध केला आहे. जेडीयूच्या प्रवक्त्याने याबाबत मंगळवारी एक निवेदन जारी केले. 'एकीकडे भाजप 'एक देश, एक कायदा' बोलतो आणि त्याच पक्षाचे गोव्याचे मुख्यमंत्री यूपी आणि बिहारच्या मजुरांना गुन्हेगार म्हणतात. त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या विभागाशी संबंधित 'नॅशनल क्राईम ब्युरो'चा डेटा पाहावा. गुजरातमध्ये खोट्या केसेसमध्ये बिहार आणि यूपीच्या लोकांना सर्वाधिक छळले जाते.' असे

तसेच, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी बिहार आणि यूपीमधील मजुरांवर केलेल्या वक्तव्यावर जेडीयूचे प्रदेशाध्यक्ष उमेश सिंह कुशवाह यांनीही पलटवार करत भाजप सुरुवातीपासूनच उत्तर भारतीयांच्या विरोधात असल्याचे म्हटले आहे. भाजपशासित राज्यांमध्ये बिहारी मजुरांना तुच्छतेने पाहिले जाते आणि त्यांचे शोषण केले जाते हे सर्वश्रुत आहे. गोव्याचे प्रमोद सावंत यांचे बिहारींबद्दलचे वक्तव्य बिहारी अभिमानाला धक्का लावण्यासारखे आहे. या विधानाबद्दल त्यांनी माफी मागितली पाहिजे. अशी मागणी कुशवाह यांनी केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rishabh Pant: ऋषभ पंतने सोडले लखनऊ सुपर जायंट्सचे कर्णधारपद! अपयशाची स्वीकारली संपूर्ण जबाबदारी; पण संघात राहणार का?

NEET Paper Leak: 'फक्त बळीचा बकरा बनवून चालणार नाही, खऱ्या मास्टरमांइडला शोधा'; सर्वोच्च न्यायालयाची केंद्र सरकार आणि NTA ला सक्त ताकीद

Budh Gochar 2026: गुंतवणुकीतून बंपर नफा आणि परदेश प्रवासाचा योग! बुधाचे गोचर ठरणार वरदान; 3 राशींवर होणार पैशांचा पाऊस

VIDEO: अंदाज चुकला की चपलेचा सणसणीत दणका! सोशल मीडियावर अतरंगी गेमचा व्हिडिओ व्हायरल; नेटकरी हसून हसून लोटपोट

स्मार्ट चष्म्यांच्या वापरातून फिक्सिंग... आयपीएल फायनलपूर्वी खळबळ, BCCI ॲक्शन मोडमध्ये! 'या' गोष्टीवर घातली बंदी

SCROLL FOR NEXT