सासष्टी: कोलीमोड्डी, गिरदोळी येथे गेले दहा दिवस पाणीपुरवठा ठप्प असल्याने स्थानिकांचे हाल झाले आहेत. गुरुवारी स्थानिकांनी बड्डे येथील पीडब्ल्यूडी कचेरीत येऊन सहाय्यक अभियंता दिपक देसाई यांना घेराव घालत धारेवर धरले.
लवकरात लवकर गावात पाणीपुरवठा करावा, अशी मागणी स्थानिकांनी यावेळी केली. येथील विहिरीतील पाणी देखील आटलेले आहे, असे त्यांनी सांगितले. गिरदोळीचे पंच फ्रॅंकी रॉड्रिग्स स्थानिकांसोबत होते. रॉड्रिग्स यांनी सांगितले की, आम्ही कित्येक वेळा कचेरीत येऊन गेलो;
पण प्रत्येक वेळी अभियंता गैरहजर असल्याचे दिसून आले. कचेरीतील कर्मचारीसुद्धा नेमके ते कुठे गेले, हे सांगू शकले नाहीत. नोव्हेंबरमध्ये पाऊस संपला आणि तेव्हापासून पाण्याची समस्या सुरू झाली. आता ते तिथे नवीन जलवाहिनी घालणार असल्याचे सांगतात.
या संदर्भात सहाय्यक अभियंता दिपक देसाई यांनी सांगितले की, या भागात पाणीपुरवठा करणारी एसी जलवाहिनी ३० वर्षांपूर्वीची आहे. पाण्याचा दाब वाढला तर ती फुटते. सध्या जलवाहिनी फुटलेली आहे. आम्ही नवीन जलवाहिनी गिरदोळी-माकाझनकडून घालण्याच्या प्रयत्नात आहोत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.