COVID-19 Dainik Gomantak
गोवा

गोव्यात कोविडने 8 मुलांचे पालक हिरावले

या सर्व मुलांना त्यांच्या नातलगांनीच आधार दिला आहे.

दैनिक गोमन्तक

पणजी: कोरोनाकाळात गोव्यातील अनेक लोकांनी आपले मित्र आणि कुटुंबातील सदस्य गमावले. कोरोनाच्या पहिल्या लाटेत संसर्गाचे प्रमाण अधिक होते. मात्र, मृत्यू दर कमी होता. पण दुसऱ्या लाटेत हे चित्र बदलले. यात राज्यातील अनेकांचे बळी गेले. कोविडच्या (COVID-19) तिसऱ्या लाटेत राज्यातील 3 मुलांनी आपले पालक गमावले आहेत. दुसऱ्या लाटेत 5 मुले अनाथ झाली होती. या 8 मुलांमध्ये एका 16 वर्षीय मुलाचा समावेश आहे. इतर 7 मुलांचे वय 16 पेक्षा कमी असल्याची माहिती समोर आली आहे. (Coronavirus Goa)

कोरोनाकाळात अनाथ झालेल्या मुलांचे संगोपन, शिक्षण (Education) यांबाबत सरकारी पातळीवरून प्रयत्न करण्यात येत आहेत. या सर्व मुलांना त्यांच्या नातलगांनीच आधार दिला असून त्यांच्या मोफत शिक्षणाची जबाबदारी राज्य सरकारने स्वीकारली आहे. या मुलांना दोन लाखांचे आर्थिक सहाय्य मिळवून देण्याची प्रक्रिया महिला आणि बाल कल्याण खात्यामार्फत सुरू आहे.

आई वडिलांचे छत्र हरवलेल्या मुलांच्या मदतीसाठी राज्यातील अनेक स्वयंसेवी संस्था (NGO) पुढे आल्या आहेत. दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार केंद्रीय महिला आणि बाल कल्याण खाते प्रत्येक महिन्याला प्रत्येक राज्यातील अनाथ मुलांचा आढावा घेत आहे. काही दिवसांपूर्वी केंद्रीय मंत्रालयाने गोव्यातील महिला आणि बाल कल्याण खात्याकडून गोव्यातील आठ मुलांची माहिती घेतली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Commonwealth Games 2030: राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत 'क्रिकेट'चे सामने होणार?सामन्यांसाठी अहमदाबाद नव्हे तर 'या' शहराची निवड

Goa Live Updates: बोरी पूल वाहतुकीस दोन दिवस राहणार बंद

'IFFI 2025'त 'ही मॅन' धर्मेंद्र यांना श्रद्धांजली वाहताना आमिर खान भावुक! जुन्या आठवणींना दिला उजाळा

Bicholim: ..आणखी कितीजणांचे 'बळी' जाण्याची वाट पाहणार? व्हाळशीतील अपघात टाळण्यासाठी मागणी; जंक्शन ठरतेय मृत्यूचा सापळा

Valpoi: 'रस्ता, गटार किमान 5 वर्षे टिकावेत'! वाळपईवासीयांचे मत, भूमिगत केबल्सची कायम स्वरुपी व्यवस्थेची मागणी

SCROLL FOR NEXT