Crime
Crime Dainik Gomantak
गोवा

गुन्हेगारी टोळ्यांचे राज्यात थैमान

दैनिक गोमन्तक

पणजी: भाजप सरकार (BJP Government) हे ‘सरकार तुमच्या दारी’ अभियानात व्यस्त असताना राज्यातील कायदा व सुव्यवस्थेचे तीन तेरा वाजत आहेत. गेल्या काही वर्षात गुन्हेगारी टोळ्या सक्रीय होऊन ‘गँगवार’च्या घटना घडत आहेत. या टोळ्यांनी पुन्हा राज्यात डोके वर काढले असून पोलिस यंत्रणा गुन्हेगारांवर नियंत्रण अपयशी ठरले आहेत. किनारपट्टी भागासह इतर परिसरात नव्या गुन्हेगारांचा उदय होत असून लाहन-सहान व्यापाऱ्यांकडून खंडणी व हप्तेवसुली करण्याच्या अधिकार क्षेत्रावरून या टोळ्यांमध्ये वारंवार हल्ले होत असल्याने ही चिंतेची बाब ठरली आहे. कळंगुट मार्केटमध्ये झालेल्या दोन गुन्हेगारी टोळीतील चौघांना अटक करण्यात आली आहे व इतरांचा शोध पोलिस घेत आहेत.

कळंगुट मार्केटमध्ये काल रात्री उशिरा दोन गुन्हेगारी टोळ्यांमध्ये झालेल्या हल्ल्यामध्ये चॉपर व सुरे यासारखे तीक्ष्ण हत्‍यारांचा वापर करण्यात आला. त्यामुळे राज्यात या गुन्हेगारी टोळ्यांमुळे दहशतीमुळे भीतीचे वातावरण सध्या आहे. राज्यात गेल्या काही महिन्यात लैंगिक अत्याचाराची प्रकरणे घडल्याने महिलाही असुरक्षित असल्‍याचे महिला संघटनांकडूनही आरोप झाले होते. कायदा व सुव्यवस्था कोलमडली असली तरी सरकार मात्र आगामी निवडणुकीवर डोळा ठेवून पक्षाचे कार्यक्रम पुढे रेटण्यात व्यस्त आहे.

सामान्य जनतेच्या मनात या ‘गँगवॉर’मुळे असलेली भीती दूर करण्यासाठी गृह खात्याकडून ठोस पावले उचलली जात नसल्याने संताप व्यक्त केला जात आहे. या गुन्हेगारी टोळ्यांना पोलिसांचा धाक नसल्यानेच दिवसाढवळ्याही हल्ल्याच्या घटना गेल्या काही वर्षात घडल्या आहेत. या टोळ्यांकडून सुपारी घेऊन एखाद्याचा काटा काढण्याचे प्रकारही घडत आहेत. कळंगुट येथे काल रात्री झालेल्या दोन गँगच्या हल्ल्यात एकजण गंभीर झाला होता तर इतर तिघे किरकोळ जखमी झाले होते. हा हल्ला दोन टोळ्यांमध्ये असलेल्या पूर्ववैमनस्यातून झाला. याप्रकरणी कळंगुट पोलिसांनी टारझन या टोपण नावाने ओळखण्यात येत असलेला गुन्हेगार ‘टारझन’ तसेच इमरान बेपारी, सूर्यकांत कांबळी व सूरज शेट्ये या चौघांना अटक केली आहे. दोन्ही टोळीतील हल्लेखोरांची माहिती पोलिसांनी मिळवली असून त्यांचा शोध घेत आहेत. इमरान, सूर्यकांत व सूरज हे हल्ल्यानंतर गोव्याबाहेर जाण्याच्या प्रयत्नात असतानाचा त्यांच्या मुसक्या आवळण्यात आल्या आहेत.

काही दिवसांपूर्वी वास्को येथेही एका गुन्हेगारी प्रवृत्तीच्या टोळीने भर दिवसाढवळ्या बस अडवून धुडगूस घातला होता. बसमधील तरुणांना उतरण्यास भाग पाडले होते. दोन वर्षापूर्वी मेरशी येथेही मध्यरात्रीच्यावेळी दोन टोळ्यांमध्ये गँगवॉर झाले होते. त्यावेळी एका टोळीतील हल्लेखोर पिस्तुलची गोळी लागून ठार झाला होता. चिंबल येथेही सकाळच्या सुमारास एका हॉटेलमध्ये नास्ता घेण्यासाठी महाराष्ट्रातील पर्यटक थांबले होते. तेथे झालेल्या बाचाबाचीवरून गुन्हेगाराने साथिदारांना आणून ही बस अडवून गुन्हेगारांनी चॉपर व तलवारीने हल्ला केला होता. या हल्ल्यात काही पर्यटक तसेच गुन्हेगार गंभीर जखमी झाले होते. ताळगाव येथे दोन गटातील हल्ल्याचे पर्यावसान रायबंदरपर्यंत येथे पाठलाग करणाऱ्या एका टोळीतील हल्लेखाराचा तलवारीने हात कापण्यात आला होता व त्यानंतर त्याचे इस्पितळात निधन झाले होते.

राज्यात गुन्हेगारी, वेश्‍या व्यवसाय, अंमलीपदार्थ, सट्टेबाजी, जुगार या प्रकरणांना या गुन्हेगारी टोळींकडून संरक्षण देऊन त्यांच्याकडून खंडणीवुसलीचे प्रकार घडत आहेत. या प्रकारांना पोलिसांचे अभय असल्यानेच या टोळ्या बिनदिक्कतपणे हल्ले करण्यास घाबरत नाही. काही गुन्हेगार हत्यारे बाळगूनच फिरत असल्याने जनतेमध्येही भितीचे वातावरण पसरले आहे. या टोळ्यांचे आतंरराज्य कनेक्शन असल्याने अनेकदा गुन्ह्यासाठी सुपारीही दिली जाते.

राज्यातली कायदा आणि सुव्यवस्था ढासळल्याच्या आरोप करत शिवसैनिकांनी घेतली राज्यपालांची भेट

राज्यातली कायदा आणि सुव्यवस्था ढासळल्याच्या आरोप करत शिवसैनिकांनी घेतली राज्यपालांची भेट

गोव्यातली कायदा आणि सुव्यवस्था ढासळली असून समुद्रकिनाऱ्यांवर ती मुलींवर बलात्काराच्या घटना घडत आहेत. अनेक घटनांमध्ये पोलीस यंत्रणा तपासामध्ये कमी पडत आहे. समुद्रकिनाऱ्यांवर अंमली पदार्थांचा वापर वाढत आहे याबाबत राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना आवश्यक त्या सूचना द्याव्यात अशी मागणी करत शिवसेनेच्या शिष्टमंडळाने राज्यपाल पी एस श्रीधरन पिल्लई यांची भेट घेतली. या शिष्टमंडळात शिवसेनेचे प्रदेशाध्यक्ष जितेश कामत , सरचिटणीस मिलिंद गावस ,सुशांत पावसकर , विंसेन्ट परेरा, गुरुदास गावकर आदी उपस्थित होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

PM Modi ON UCC: ‘’गोव्यातील लोक एक सारखे कपडे घालतात का?’’ समान नागरी कायद्याच्या प्रश्नावर मोदी स्पष्टच बोलले

SSC Result 2024 : पेडणे तालुक्यातील ३२ पैकी १५ शाळांचा निकाल १०० टक्के

Land Grabbing Case: गोवा जमीन हडप प्रकरण; ईडीची 36 जणांविरोधात मनी लाँड्रिंगची तक्रार

Goa And Kokan Today's Live News: जेनिफर ऑलिवेरा यांचे सरपंचपद अबाधित

E-Vehicle : ई-वाहन खरेदीकडे ग्राहकांची पाठ; दरमहा ८२४ वाहनांची नोंद

SCROLL FOR NEXT