Congress candidates list  Dainik Gomantak
गोवा

काँग्रेसकडून उमेदवारांची चौथी यादीही जाहीर

नुवेत आलेक्स सिक्वेरा तर वेळ्ळीमधून सावियो डिसिल्व्हा यांना उमेदवारी

दैनिक गोमन्तक

मडगाव : गोव्यात काँग्रेसने आपली उमेदवारांची चौथी यादीही जाहीर केली आहे. मंगळवारी रात्री उशिरा काँग्रेस महासमितीचे सरचिटणीस मुकुल वासनिक यांनी आणखी दोन काँग्रेस उमेदवारांची नावे जाहीर केली. नुवे मतदारसंघात कार्याध्यक्ष आलेक्स सिक्वेरा तर वेळ्ळी मतदारसंघात सावियो डिसिल्व्हा यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. (Congress News Updates)

काँग्रेसने (Congress) मंगळवारी गोवा विधानसभा निवडणुकीसाठी तिसरी यादी जाहीर केली होती. ज्यात डिचोलीतून मेघश्याम राऊत, थिवीमधून अमन लोटलीकर, कळंगुटमधून मायकल लोबो, पर्वरीत विकास प्रभुदेसाई, सांत आंद्रेमधून अँथनी फर्नांडिस, तर साखळीतून धर्मेश सगलानी यांना उमेदवारी जाहीर केली आहे. दरम्यान मुख्यमंत्री प्रमोद सावंतही आपल्या साखळी मतदारसंघातूनच विधानसभा निवडणूक (Goa Assembly Elections) लढवण्याची शक्यता आहे.

काँग्रेसच्या तिसऱ्या यादीत मडकईतून लवू मामलेदार, सांगेतून प्रसाद गावकर, काणकोणमध्ये जनार्दन भंडारी यांचंही नाव जाहीर करण्यात आलं आहे. मडकईतून काँग्रेसची उमेदवारी मिळालेले लवू मामलेदार यांनी तृणमूलमध्ये (TMC) प्रवेश करुन काही दिवसांमध्येच पक्ष सोडला होता. आता मडकईतून त्यांना मगोपच्या सुदिन ढवळीकरांविरोधात निवडणूक लढवावी लागणार आहे. त्यामुळे ही निवडणूक नक्कीच चुरशीची होणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Virat Kohli: 'किंग'चा लाजिरवाणा कमबॅक: 7 महिन्यांनी परतला, पण फक्त 8 चेंडू खेळून 'शून्य'वर बाद; लज्जास्पद विक्रमाची नोंद VIDEO

कणखर गृहमंत्री ते संवेदनशील कृषीमंत्री: रवी नाईक यांच्या व्यक्तिमत्त्वाचं मुख्यमंत्री फडणवीसांकडून गौरवोद्गार

Ravi Naik: 'मी फक्त पुढे, सेनापती मात्र रवीच'; दिवंगत नेत्याला भावनिक आदरांजली

Horoscope: 71 वर्षांनंतर महासंयोग! यंदाची दिवाळी 5 शुभ योगांची, 'या' राशींचे भाग्य उजळणार; शुभ कार्यांसाठी सर्वोत्तम काळ

1310-1312 मध्ये अल्लाउद्दीन खिलजीच्या मोठ्या सैन्याने कोकणात प्रवेश केला, कदंबांची गोव्यातील राजधानी गोपकपट्टणाचा नाश केला..

SCROLL FOR NEXT