पणजी: पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आपला वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे. ते कुठेही शुभेच्छा स्वीकारण्यासाठी उपलब्ध नसतील, असे त्यांनी मंत्रालयात पत्रकारांशी बोलताना सांगितले.
मडगाव, पणजी, म्हापसा येथील भाजप कार्यालयात शुभेच्छा स्वीकारण्यासाठी उद्या दिवसभर ते उपलब्ध असणार होते. सायंकाळी साखळी येथील रवींद्र भवनात जनतेच्या शुभेच्छा स्वीकारणार होते. मात्र आता हे सगळे कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. सामाजिक कार्यक्रम होतील. त्यात साखळी येथील आरोग्य शिबिराचाही समावेश आहे.
काजू महोत्सव पुढे ढकलला
दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर राज्यातील पूर्वनियोजित २५ ते २७ एप्रिल यादरम्यान होणारा ‘गोवा काजू महोत्सव’ पुढे ढकलण्यात आला आहे. तसेच या हल्ल्यात मरण पावलेल्या नागरिकांना आम्ही श्रद्धांजली वाहत असून त्यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत, असे गोवा वनविकास महामंडळाच्या अध्यक्षा आमदार डॉ. दिव्या राणे यांनी प्रसिद्धिपत्रकात म्हटले आहे.
काजू महोत्सवाच्या तारखा मागाहून जाहीर करण्यात येतील. देशात दुःखाचे वातावरण असताना महोत्सव साजरा करणे उचित ठरणार नाही. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचे कळविण्यात आले आहे.
दरम्यान, उत्तर गोवा जिल्हा पंचायतीच्या वतीने उद्या पंचायतराजदिन कार्यक्रमाच्या अनुषंगाने आयोजित ‘ग्रामोत्सव’ कार्यक्रमही पुढे ढकलण्यात आला असल्याचे कळविण्यात आले आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.