डिचोली: स्वातंत्र्यपूर्व काळात देशासाठी बलिदान देण्याची वेळ होती. मात्र, आता देशासाठी जगण्याची वेळ आहे. स्वातंत्र्यसैनिकांच्या त्यागाचे स्मरण करून देशाला ‘युवा भारत’ बनविण्याची जबाबदारी आजच्या विद्यार्थ्यांची आहे, असे मत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी व्यक्त केले.
डिचोलीच्या (Bicholim) अवरलेडी ऑफ ग्रेस हायस्कुलात आयोजित ‘वंदे मातरम्’ कार्यक्रमात सहभागी होताना मुख्यमंत्र्यांनी जोशपूर्ण भाषणाने विद्यार्थ्यांना संबोधित केले. देशाचे प्रेरणा गीत असलेल्या ‘वंदे मातरम्’ या गीताला २४ जानेवारी १९५० या दिवशी राष्ट्रीय गीत म्हणून मान्यता मिळाली आहे. ७५ वर्षपूर्तीनिमित्त आज (शुक्रवारी) सर्व शाळांनी एकाचवेळी ‘वंदे मातरम्’चा कार्यक्रम उत्साहात पार पडला.
मुख्यमंत्री डॉ. सावंत यांच्यासह सुभाष शिरोडकर आणि डॉ. चंद्रकांत शेट्ये यांचे अवरलेडी शाळेत आगमन होताच शाळेतर्फे त्यांचे उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले. त्यांच्याच उपस्थितीत शाळेच्या आवारात गानवृंदासह विद्यार्थ्यांनी सुरेल आवाजात ‘वंदे मातरम्’ गीत सादर केले. यावेळी डिचोलीच्या तालुका भाग शिक्षणाधिकारी लीना कळंगुटकर, अवर लेडी चर्चचे फादर सुकूर रिबेलो यांच्यासह शाळेच्या मुख्याध्यापिका मास्कारेन्हस तसेच शिक्षक उपस्थित होते. यावेळी ‘वंदे मातरम्’, ‘भारत माता की जय’ अशा घोषणा देण्यात आल्या
‘वंदे मातरम्’ हे स्फूर्ती देणारे, प्रेरणादायी तसेच देशाबद्दल राष्ट्रभावना आणि अभिमान जागृत करणारे गीत आहे. देशाला महासत्ता बनविण्यासाठी विद्यार्थ्यांनी (Students) सदैव ‘तंदुरुस्त’ राहून विविध क्षेत्रात कौशल्य विकसित करावे, असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.