काणकोण: चावडी येथील रवींद्र भवनजवळ राहणारे उल्हास कोमरपंत यांच्या घरात पावसाचे पाणी घुसल्याने मोठा हाहाकार माजला.
रवींद्र भवनाची उभारणी करताना पाण्याचा निचरा करणारे गटार बुजविण्यात तसेच रवींद्र भवनच्या प्रवेशद्वाराजवळ असलेल्या गटारात पाणी वाहून जाण्यासाठी कमी व्यासाचा पाइप घातल्याने या ठिकाणी पाणी तुंबून राहत आहे. याचा फटका कोमरपंत यांनाही बसला.
याबाबत माहिती मिळताच चावडी वार्डाचे नगरसेवक रमाकांत नाईक यांनी जेसीबीच्या साह्याने गटार उपसून पाण्याला वाट करून देण्याचा प्रयत्न केला मात्र पाणी जाण्यास वाट नसल्याने त्यांचे प्रयत्न निष्फळ ठरले. यासंदर्भात सभापती रमेश तवडकर यांना माहिती देण्यात येईल, असे नगरसेवक नाईक गावकर यांनी सांगितले.
या रवींद्र भवनाच्या उद्घाटनापूर्वी कला व संस्कृती मंत्री गोविंद गावडे हे या ठिकाणी आले असता कोमरपंत यांनी नगरसेवक रमाकांत नाईक गावकर यांच्या समवेत गावडेंची भेट घेउन पावसाळ्यात समस्या निर्माण होणार असल्याचे सांगितले होते. त्यावेळी मंत्र्यांनी बांधकाम ठेकेदाराला उपाययोजना करण्याची सूचना केली होती, पण याकडे दुर्लक्ष केल्याने समस्या निर्माण झाली आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.