Goa Politics Dainik Gomantak
गोवा

Goa Politics: भाजप सरकारचा अहंकार जनता मोडेल! अरविंद केजरीवालांची टीका, कारापूर आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतल्याचा केला निषेध

Arvind Kejriwal Criticism BJP: भाजप सरकार ७५हून अधिक दिवसांपासून गावासाठी शांतपणे लढणाऱ्या आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेऊन हुकूमशाही पद्धती अवलंबत आहे.

गोमंतक ऑनलाईन टीम

पणजी: भाजप सरकार ७५हून अधिक दिवसांपासून गावासाठी शांतपणे लढणाऱ्या आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेऊन हुकूमशाही पद्धती अवलंबत आहे. जसा गोमंतकीयांनी एकत्र येऊन पोर्तुगीज सत्तेचा अहंकार मोडून काढला, तसेच ते पुन्हा आगामी निवडणुकीत भाजपचा अहंकार मोडून काढतील, असे मत ‘आप’चे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांनी व्यक्त केले.

गोवा क्रांतिदिनानिमित्त केजरीवाल यांच्यासह गोवा प्रभारी आतिषी मार्लेना, गोवा प्रदेशाध्यक्ष वाल्मिकी नाईक व इतर नेत्यांनी आझाद मैदानावर गोव्याच्या स्वातंत्र्यसैनिकांना गुरुवारी (ता.१८) श्रद्धांजली वाहिली.

दरम्यान, लोढा मेगा प्रकल्प रद्द होईपर्यंत हा संघर्ष सुरू राहिला पाहिजे, असे केजरीवाल यांनी आंदोलकांना पाठिंबा देताना सांगितले.

‘आप’चा पाठिंबा!

आझाद मैदानावर श्रद्धांजली अर्पण केल्यानंतर वाल्मिकी नाईक, क्रूझ सिल्वा, संदेश तेलेकर-देसाई व इतरांनी जुनेगोवे पोलिस स्थानकाकडे धाव घेतली. त्याठिकाणी कारापूर आंदोलनकर्त्यांची भेट घेतली व त्यांना पाठिंबा दिला. अन्यायाविरोधात आवाज उठवणाऱ्यांना ताब्यात घेण्याच्या वृत्तीचा त्यांनी निषेध केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Section 39A Protest: आता गावागावांतून आंदोलन! कलम '39अ'विरोधात आमदार वीरेश बोरकर यांची घोषणा

खरी कुजबुज: सरकारची अशीही हुशारी!

दणका! वेर्णात वृक्षतोडीला स्थगिती, उच्च न्यायालयाचा निर्णय; तज्ज्ञ समितीकडून पाहणी

Karapur Mega Project Protest: आंदोलकांना पणजीत रोखले; गुन्हे न नोंदविताच सोडले, मेगा प्रकल्पाविरोधात कारापूरवासी एकवटले

Monsoon Update: पावसाचा दिलासा 22 जूननंतरच; राज्य हवामान विभागाचा अंदाज; आता पाणी जपूनच वापरा! धरणांतील पाणी आटल्‍यानं जलस्रोत खात्‍याला चिंता

SCROLL FOR NEXT