Solar Power Equipment Dainik Gomantak
गोवा

Goa Environment: सौर उर्जा उपकरणांसाठी सरकारचे 50 टक्के अनुदान पण...

सरकारने सौर उर्जा उपकरणांसाठी 50 टक्के अनुदान देणारी योजना आणली. परंतु या योजनेचा लाभ घेण्यासाठी नागरिक पुढे येताना दिसत नाहीत,

दैनिक गोमन्तक

Goa Environment: गोव्यात कोळसा आधारित वीज प्रकल्प नको म्हणणारे स्वतः मात्र कोणतेच प्रयत्न करायला तयार नाहीत. सरकारने सौर उर्जा उपकरणांसाठी 50 टक्के अनुदान देणारी योजना आणली. परंतु या योजनेचा लाभ घेण्यासाठी नागरिक पुढे येताना दिसत नाहीत,अशी खंत पर्यावरणमंत्री नीलेश काब्राल यांनी व्यक्त केली.

ते राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाद्वारे डॉ. श्‍यामाप्रसाद मुखर्जी स्टेडियमवर आंतराष्ट्रीय पर्यावरण आणि शाश्‍वतता परिषदेच्या उद्‍घाटन समारंभात बोलत होते.

यावेळी व्यासपीठावर पर्यावरण सचिव अरूण मिश्रा, राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष महेश पाटील,सीआयआयचे उपाध्यक्ष अनिरूद्ध अगरवाल, व शमिला मोंतेरो उपस्थित होत्या.

4 फेब्रुवारीपर्यंत ही परिषद चालणार असून विविध परिसंवादांचे तसेच पर्यावरण संवर्धनात उपयुक्त ठरणाऱ्या उपकरण आणि इतर साहित्याचे प्रदर्शन भरविण्यात आले आहे.

दरम्यान, क्राबाल म्हणाले, आता विद्युत वाहने एकदा चार्ज केली की, सहाशे ते सातशे किलोमीटर पर्यंत चालतात. तंत्रज्ञानात मोठ्याप्रमाणात बदल होत आहेत. शाश्वत विकासाच्या उद्दिष्टाच्या पंतप्रधानांच्या व्हिजनचा भाग बनण्याचा आमचा मानस आहे.

पर्यावरण हानी रोखण्यावर भर द्या : जैवविविधता आणि अर्थकारण यांचे संतुलन राखत केलेले विकास हा शाश्‍वत विकास आहे. गरिबी हे पर्यावरणाला असलेले सर्वात मोठे आव्हान आहे. शाश्‍वत विकासासाठी तंत्रज्ञानाचे योगदान महत्त्वाचे आहे.

कंपन्यांनी उत्पादन बनविताना पर्यावरणाची हानी कमी कशी होईल, यावर भर देणे गरजेचे आहे. ग्राहकांनी पर्यावरण संवर्धनासाठी शक्य तेवढा अधिक काळ उपकरणांचा वापर करावा तसेच सरकारी स्तरावर पर्यावरण संबंध विविध संस्था आपले काम योग्य करत आहेत का, यावर लक्ष देणे गरजेचे आहे,असे अरूण मिश्रा यांनी सांगितले.

सर्वांचे योगदान हवे- सिंग

हवामान बदलाचे आव्हान रोखण्यासाठी केवळ नियम करून भागणार नाही, तर त्यासाठी विविध संघटना, उद्योग समूह तसेच नागरिक या सर्वांचे योगदान गरजेचे आहे,असे प्रतिपादन सॅब इंडियाचे बिकास सिंग यांनी केले.

ते हवामान बदलांवर आयोजित परिसंवादात बोलत होते. यावेळी ‘स्कोडा’चे उपाध्यक्ष संदीप खरे, सन 360 कंपनीचे प्रमुख अनिष सौझा, सुद-केमीचे व्यवस्थापक श्री श्रीनिवास उपस्थित होते. सिंग पुढे म्हणाले, हवामान बदल परिणाम शून्यावर आणण्यासाठी तंत्रज्ञान महत्त्वाचे योगदान देऊ शकते.

हरित उर्जेला प्राधान्य आवश्‍यक

जगभरात हवामान बदलाचे परिणाम दिसून येत आहेत. तापमानवाढ, समुद्राच्या पातळीत वाढ आदी समस्या जाणवत आहेत, हवामान बदल, जैवविविधतेची हानी आणि गरिबी ही तीन देशापुढील आव्हाने आहेत.

या बाबींबर अधिक काम करण्याची गरज आहे. भारतात सर्वात अधिक युवक आहेत. तसेच देशात अनेक प्रकल्प उभारले जात आहेत. आम्ही विकसनशील देश आहोत, त्यामुळे कोळसा, वीज यांचा वापर कमी करण्याचा प्रयत्न होणे गरजेचे असून हरीत उर्जेच्या वापराला प्राधान्य देणे गरजेचे आहे,असे ‘स्कोडा’चे उपाध्यक्ष संदीप खरे यांनी सांगितले.

प्रभू, सावंत अनुपस्थित

परिषदेच्या उद्‍घाटनप्रसंगी राज्यसभा सदस्य आणि माजी केंद्रियमंत्री सुरेश प्रभू हे मुख्य वक्ते म्हणून उपस्थित राहणार होते. पण ते अनुपस्थित राहिले. मंत्री नीलेश काब्राल म्हणाले मुख्यमंत्री सावंत यांना गोव्याबाहेर जावे लागल्याने उपस्थित राहू शकले नाहीत. परंतु त्यांनी या परिषदेला शुभेच्छा दिल्या असून ते नेमके कोठे गेले, याबाबत काहीच सांगितलेले नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Crime News: लिव्ह-इन, लग्न अन् मग मृत्यूचा थरार! नवऱ्यानं घेतला गळफास, बायकोनं 17व्या मजल्यावरुन मारली उडी; बंगळुरुतील धक्कादायक घटना

IPL 2026: आयपीएल ब्रेकिंग! मुंबई-कोलकाता सामना संपताच मूत्यू; मुंबईतील हॅाटेलमध्ये सापडला मृतदेह

Guru Gochar 2026: नशिबाचा मास्टरस्ट्रोक! 'या' 5 राशींसाठी एप्रिल महिना ठरणार 'टर्निंग पॉईंट'; धन वर्षावासह करिअरमध्ये प्रगतीची संधी

Dailyhunt आणि Josh च्या प्रगतीला नवा वेग! पी. आर. रमेश आता सांभाळणार VerSe Innovation च्या ऑडिट कमिटीची धुरा

US Iran War: 21 युद्धनौका, 3500 कमांडो, 50000 सैनिक… तरीही ट्रम्प इराणचे 440 किलो युरेनियम जप्त करु शकणार नाहीत, कारण काय?

SCROLL FOR NEXT