BJP VS Congress Dainik Gomantak
गोवा निवडणूक

Goa Election 2022: आमदारांच्या जोडणीसाठी आतापासूनच लॉबिंग सुरू

लॉबिंग करण्याची जबाबदारी यावेळी विश्वजीत राणे आणि बाबुश मोन्सरात यांनी घेतली आहे.

दैनिक गोमन्तक

मडगाव: 2017 मध्ये काँग्रेसकडे 17 आमदार असतानाही भाजपने बाहेरच्या बाहेर लॉबिंग करून आपले 13 आमदार असतानाही सरकार घडविले होते. मागच्यावेळी हे लॉबिंग करण्यात स्व. मनोहर पर्रीकर यांनी पुढाकार घेतला होता. यावेळी ती जबाबदारी विश्वजीत राणे व बाबुश मोन्सरात यांनी प्रामुख्याने घेतली आहे.

यावेळी भाजपची गाडी 14 पर्यंतच अडकण्याची शक्यता व्यक्त केली जात असून काँग्रेसही 16 च्यावर जाणार नाही असा अंदाज व्यक्त केला जात आहे. या पार्श्वभूमीवर दोन्ही बाजूंचे नेते फोडाफोडीच्या राजकारणात सक्रिय होऊ शकतात असे सांगितले जाते.

सध्या भाजपच्या बाजूने विश्वजीत राणे व बाबुश मोन्सरात यांनी अन्य पक्षातील संभाव्य आमदारांशी संपर्क साधणे सुरू केले आहे. मुख्यमंत्री प्रमोद सावंत व माविन गुदिन्हो यांनीही काही संभाव्य विजेत्यांशी संपर्क साधला असून ते दोघे काँग्रेसच्याही आमदारांना फोडू पहात असल्याचा आरोप गिरीश चोडणकर यांनी केला आहे.

काँग्रेससाठी लोबोंचा पुढाकार

दुसऱ्या बाजूने काँग्रेसकडूनही हे प्रयत्न सुरू असून मायकल लोबो यांनी त्यासाठी पुढाकार घेतल्याची माहिती प्राप्त झाली आहे. यासंबंधी गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांना विचारले असता, भाजपच्या प्रयत्नांना यश मिळणार नाही, असे ते म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: "आता बस करा माही भाई!" धोनीला नीट चालताना येईना, IPLपूर्वी फिटनेसवर प्रश्नचिन्ह, व्हिडिओ पाहून फॅन्सचं टेन्शन वाढलं

Savoi Verem: सफर गोव्याची! श्री अनंत देवाचं मनमोहक देऊळ आणि हिरवीगार कुळागरं लाभलेलं 'सावई-वेरे'

Sal River Pollution: गंभीर अवस्था! प्रदूषणामुळे 'साळ नदी'त प्राणवायूचे प्रमाण शून्य, कचरा-सांडपाण्यामुळे धोक्याची घंटा

Goa School Admission: गोव्यात पहिलीच्या प्रवेशाबाबत नियमात मोठा बदल; वयाची अट बदलली, सरकारने घेतला मोठा निर्णय

Opinion: भारतातील शहरांना भविष्यात अधिकाधिक पाण्याची गरज भासणार आहे, पण आपण ही मागणी पूर्ण करू शकू का?

SCROLL FOR NEXT