Deepak Dhavalikar Dainik Gomantak
गोवा निवडणूक

गोव्यात परिवर्तनासाठी मतदारांचा कौल, भाजपविरोधी जनमत : दीपक ढवळीकर

लोकांच्या अपेक्षा पूर्ण करण्याची ताकद आपल्यात असल्याचा दीपक ढवळीकरांचा दावा

आदित्य जोशी

पणजी : आपण प्रियोळ मतदारसंघात 70 टक्के मतं मिळवणार असून गोमंतकीय जनतेला परिवर्तन हवं आहे, अशी प्रतिक्रिया मगोप नेते दीपक ढवळीकर यांनी दिली आहे. गोवा विधानसभा निवडणुकीसाठी मतदानाचा हक्क बजावल्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी भाजपवर सडकून टीका केली. लोकांनी माझं काम पाहिलं आहे त्यामुळे ते आपल्याला निवडून देतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. (Deepak Dhavalikar News Updates)

लोकांच्या अपेक्षा पूर्ण करण्याची ताकद आपल्यात आहे. हे जनतेला माहित आहे त्यामुळे ते आपल्याला मतदान करतील, असा दावाही दीपक ढवळीकर यांनी केला आहे. आज गोव्यात लोकं मतदान करत आहेत ते परिवर्तनासाठी आहे. कारण गोव्यात (Goa) परिवर्तनाची गरज आहे. लोक सरकारला त्याची जागा दाखवायला घराबाहेर पडले आहेत, असा निशाणाही त्यांनी साधला.

दरम्यान गोव्यात सत्तेत येणारं सरकार हे भाजपविरोधी (BJP) सरकारच असेल. आणि जो भ्रष्टाचार या सरकारने गेल्या 5 वर्षात केला आहे, त्याचा अनुभव लोकांनी घेतला आहे. त्यामुळे बदल घडवण्यासाठी गोमंतकीय जनता (Voter) घराबाहेर पडून मतदान करत आहे, असंही दीपक ढवळीकर यांनी म्हटले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Crime News: माहेरी गेलेली बायको परत आली नाही, नैराश्यातून तीन पोरींचा जीव घेऊन स्वतःला संपवलं; सुधाकरनं ओलांडली 'क्रूरतेची सीमा'

PM Kisan Nidhi 23rd Installment: पीएम किसानचा 2,000 रुपयांचा हप्ता उद्या खात्यात! यादीत नाव नसल्यास पैसे अडकू शकतात, आत्ताच अशी करा पडताळणी

Goa Development: गोव्यासाठी दिल्लीतून सुटला तब्बल 2000 कोटींचा निधी! केंद्र आणि राज्य सरकार मिळून गोव्याचा चेहरामोहरा बदलणार; कामतांचा विश्वास

Goa Tourism: 'पर्यटनात विविधता, कुशल मनुष्यबळ निर्मितीवर सरकारचा भर', राज्यात 5 नवीन महाविद्यालयांची मुख्यमंत्र्यांकडून घोषणा

Goa Water Crisis: "गोव्यातील पाणीटंचाईला सावंत सरकारच जबाबदार", युरी आलेमाव यांचा हल्लाबोल

SCROLL FOR NEXT