Pakistan Dainik Gomantak
ग्लोबल

Pakistan: भारतासोबत संबंध सुधारण्याची इच्छा परंतु....

Pakistan: विदेश मंत्रालयाच्या प्रवक्ता मुम्ताज जहरा बलोच यांनी एका पत्रकार परिषदेतून हे वक्तव्य केले आहे. दक्षिण आशियातील सगळ्या देशांसोबत पाकिस्तान आपले संबंध चांगले राखण्यासाठी शांतीपुर्ण मार्गाचा अवलंब करणे सुरु ठेवेल असेही म्हटले आहे.

दैनिक गोमन्तक

Pakistan: भारत आणि पाकिस्तानमधील वाद जुनाच आहे.दहशतवाद, काश्मीरचा मुद्दा,चीन अशा अनेक कारणांवरुन भारत आणि पाकिस्तानमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरु असतात.आता पाकिस्तानने पुन्हा एकदा भारतावर आरोप लावताना म्हटले आहे की, पाकिस्तान भारताबरोबर संबंध सुधारु इच्छितो परंतु भारताला पाकिस्तानबरोबर संबंध चांगले करण्याची इच्छा नसल्याचे म्हटले आहे.

काश्मिरबाबत चर्चेतून मार्ग काढण्यासाठी भारताने गंभीरता दाखवली पाहिजे. विदेश मंत्रालयाच्या प्रवक्ता मुम्ताज जहरा बलोच यांनी एका पत्रकार परिषदेतून हे वक्तव्य केले आहे. दक्षिण आशियातील सगळ्या देशांसोबत पाकिस्तान आपले संबंध चांगले राखण्यासाठी शांतीपुर्ण मार्गाचा अवलंब करणे सुरु ठेवेल असेही म्हटले आहे.

पुढे त्या म्हणतात,पाकिस्तानची शांती आणि संवाद यामध्ये रुची आहे.आता हे भारतावर अवलंबून आहे की भारत कोणती पद्धत आपलीशी करत आहे. पाकिस्तान( Pakistan ) चे हे म्हणणे आहे की, बऱ्याच काळापासून प्रलंबित झालेल्या विषयावर मार्ग काढणे गरजेचे आहे विशेषत: काश्मिरच्या मुद्द्यावर मार्ग काढणे गरजेचे आहे.

दरम्यान, युएन ( UN )च्या परिषदेत पाकिस्तानने काश्मीरचा मुद्द्यावर विधान केले होते तेव्हा एस.जयशंकर यांनी पाकिस्तानला खडे बोल सुनावले होते. आता पाकिस्तानच्या या विधानावर भारत काय प्रतिक्रिया देणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Dance Viral Video: माझ्या डोईवरी भरली घागर रे... कोकणातल्या पोरांचा डान्स पाहून तुम्हीही म्हणाल, 'एक नंबर...'

Vice President Candidate: ठरलं! एनडीए’चे उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार म्हणून सी.पी. राधाकृष्णन यांच्या नावाची घोषणा

America Firing: गोळीबाराने हादरले 'न्यूयॉर्क'! नाइट क्लबमध्ये बेछूट गोळीबार, 3 ठार, 8 जखमी

Goa Film Festival 2025: ज्येष्ठ अभिनेत्री वर्षा उसगावकर जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित, ‘जुझे’ ठरला सर्वाधिक पुरस्कार विजेता चित्रपट

'...नाहीतर देशाची माफी मागा’, राहुल गांधींच्या आरोपांवर मुख्य निवडणूक आयुक्तांचे थेट प्रत्युत्तर; दिली 7 दिवसांची मुदत

SCROLL FOR NEXT