Pakistan Dainik Gomantak
ग्लोबल

Pakistan: भारतासोबत संबंध सुधारण्याची इच्छा परंतु....

दैनिक गोमन्तक

Pakistan: भारत आणि पाकिस्तानमधील वाद जुनाच आहे.दहशतवाद, काश्मीरचा मुद्दा,चीन अशा अनेक कारणांवरुन भारत आणि पाकिस्तानमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरु असतात.आता पाकिस्तानने पुन्हा एकदा भारतावर आरोप लावताना म्हटले आहे की, पाकिस्तान भारताबरोबर संबंध सुधारु इच्छितो परंतु भारताला पाकिस्तानबरोबर संबंध चांगले करण्याची इच्छा नसल्याचे म्हटले आहे.

काश्मिरबाबत चर्चेतून मार्ग काढण्यासाठी भारताने गंभीरता दाखवली पाहिजे. विदेश मंत्रालयाच्या प्रवक्ता मुम्ताज जहरा बलोच यांनी एका पत्रकार परिषदेतून हे वक्तव्य केले आहे. दक्षिण आशियातील सगळ्या देशांसोबत पाकिस्तान आपले संबंध चांगले राखण्यासाठी शांतीपुर्ण मार्गाचा अवलंब करणे सुरु ठेवेल असेही म्हटले आहे.

पुढे त्या म्हणतात,पाकिस्तानची शांती आणि संवाद यामध्ये रुची आहे.आता हे भारतावर अवलंबून आहे की भारत कोणती पद्धत आपलीशी करत आहे. पाकिस्तान( Pakistan ) चे हे म्हणणे आहे की, बऱ्याच काळापासून प्रलंबित झालेल्या विषयावर मार्ग काढणे गरजेचे आहे विशेषत: काश्मिरच्या मुद्द्यावर मार्ग काढणे गरजेचे आहे.

दरम्यान, युएन ( UN )च्या परिषदेत पाकिस्तानने काश्मीरचा मुद्द्यावर विधान केले होते तेव्हा एस.जयशंकर यांनी पाकिस्तानला खडे बोल सुनावले होते. आता पाकिस्तानच्या या विधानावर भारत काय प्रतिक्रिया देणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Subhash Velingkar: सुभाष वेलिंगकरांची अटक अटळ? कोर्टाचा दिलासा नाही, जामीन अर्जावर सोमवारी सुनावणी

Saint Francis Xavier: सुभाष वेलिंगकरांच्या अटकेसाठी उद्रेक; पर्यटक, विद्यार्थ्यांचे हाल, गोव्यात दिवसभर कुठे काय घडलं?

BKC ते आरे JVLR पंतप्रधान मोदींचा मेट्रोने प्रवास; शाळकरी विद्यार्थी, महिलांशी साधला संवाद पाहा Video

Goa HSE Board Exam: गोवा बारावी बोर्ड परीक्षेच्या वेळापत्रकात बदल, JEE परीक्षेमुळे मोठा निर्णय

गिरीत बंदिस्त खोलीत आढळला मृतदेह , संशयास्पद मृत्यूचा कुटुंबियांचा अंदाज; गोव्यातील ठळक बातम्या

SCROLL FOR NEXT