China President Xi Jinping Dainik Gomantak
ग्लोबल

''आम्ही लडाखला मान्यता देत नाही...''; कलम 370 वरील SC च्या निर्णयावर चीनचं मोठं वक्तव्य

India-China Relations: जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम 370 हटवण्याच्या संसदेच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयाने मंजुरी दिली आहे.

Manish Jadhav

India-China Relations: जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम 370 हटवण्याच्या संसदेच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयाने मंजुरी दिली आहे. पाकिस्तान आणि आता चीननेही यावर प्रतिक्रिया दिली आहे. चीन सातत्याने लडाखवर आपला दावा करत आला आहे. जम्मू-काश्मीरच्या पुनर्रचनेला मान्यता देणारा सर्वोच्च न्यायालयाचा आदेश आपल्याला मान्य नसल्याचे चीनने बुधवारी स्पष्ट केले. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर चीनने सलग दुसऱ्यांदा प्रतिक्रिया दिली आहे. याआधी चीनने जम्मू-काश्मीरचा प्रश्न चर्चेने सोडवावा, असे म्हटले होते. भारत आणि पाकिस्तानने एकत्र बसून या विषयावर चर्चा करायला हवी.

चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते माओ निंग म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे चीनची भूमिका बदलणार नाही. भारत-चीन सीमेचा पश्‍चिम भाग हा आपला आहे, अशी चीनची मागणी आहे. माओ निंग पुढे म्हणाले की, 'भारताने (India) एकतर्फी आणि बेकायदेशीरपणे निर्माण केलेल्या लडाख या केंद्रशासित प्रदेशाला चीनने कधीही मान्यता दिलेली नाही. भारत-चीन सीमेचा पश्चिम भाग आमचा आहे, मात्र भारतीय न्यायालयाच्या निर्णयामुळे आमची भूमिका बदलणार नाही.'' यापूर्वी 2019 मध्ये कलम 370 हटवल्यानंतर चीनने अशीच प्रतिक्रिया दिली होती.

याआधी मंगळवारी चीनच्या प्रवक्त्याने काश्मीर मुद्द्यावर म्हटले होते की, भारत आणि पाकिस्तानने शांततेने बसून प्रश्न सोडवावा. दुसरीकडे, भारत जम्मू-काश्मीरला आपला अविभाज्य भाग मानतो. अशा परिस्थितीत पाकिस्तानला या प्रकरणात पक्षकार म्हणून स्वीकारणे ही राजनयिक चूक ठरेल. माओ निंग पुढे म्हणाले होते की, ''काश्मीरचा मुद्दा प्रदीर्घ काळापासून प्रलंबित आहे. संयुक्त राष्ट्रांच्या चार्टरनुसार यावर शांततेने तोडगा काढणे आवश्यक आहे.''

'अक्साई चीन, गिलगिट बाल्टिस्तान आणि पीओके हे भारताचे अविभाज्य भाग आहेत'

दुसरीकडे, 2019 मध्ये चीनने जम्मू-काश्मीरची पुनर्रचना करुन त्याचा विशेष दर्जा संपवण्याचा निर्णय चुकीचा असल्याचे म्हटले होते. त्याचवेळी, भारत सरकार चीन आणि पाकिस्तानची भूमिका पूर्णपणे फेटाळून लावते. गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी अक्साई चीन, गिलगिट बाल्टिस्तान आणि पीओके आमची असल्याचे सभागृहात अनेकदा सांगितले आहे. आम्ही हा भाग परत घेऊ. कलम 370 हटवल्यानंतर चीननेही संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत या विषयावर चर्चा करण्याचा प्रयत्न केला. मात्र यश मिळाले नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Battle of Galwan: रक्ताने माखलेला चेहरा, हातात धारदार शस्त्र अन् डोळ्यात देशभक्तीची चमक, 'गलवान'मधील सलमानचा पहिला लूक आला समोर

ED Goa: गोव्यात ईडीची झाडाझडती; 'सडा अर्बन'ची 1.05 कोटींची मालमत्ता तर जमीन हडप प्रकरणी संदीप वझरकर 3.19 कोटींची जमीन जप्त

Video: अप्रतिम अन् शानदार...! भर पावसात मुलांसोबत 'गजराज'नं लुटला क्रिकेटचा आनंद; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

Goa: भर पावसात प्रवासी बोट नदीत बुडाली; बाहेर काढण्यासाठी गोवा सरकारने 11 दिवसांत खर्च केले 20 लाख रुपये

Multiple Organ Failure Diseases: एकाच आजारानं हृदय, यकृत अन् मूत्रपिंड खराब होऊ शकतं का? जाणून घ्या वैज्ञानिक कारण अन् प्रतिबंधात्मक उपाय

SCROLL FOR NEXT