Indonesian Jetliner Crashes Into the Sea After Takeoff Carrying 62 fliers The Boeing 737 500 a Sriwijaya Air flight had taken off from Jakarta 
ग्लोबल

इंडोनेशियात ६२ प्रवाशांना घेऊन निघालेलं विमान समुद्रात कोसळलं

वृत्तसंस्था

जकार्ता : इंडोनेशियाची राजधानी जकार्ता येथील विमानतळावरून ६२ प्रवाशांना घेऊन निघालेले श्रीविजय कंपनीचे विमान नजीकच्याच समुद्रामध्ये कोसळल्याची घटना घडली आहे. उड्डाणानंतर काही मिनिटांमध्येच या विमानाचा नियंत्रण कक्षाशी असलेला संपर्क तुटल्याची माहिती सूत्रांनी दिली.

नजीकच्या समुद्रामध्येच या विमानाचे अवशेष आढळून आले असल्याचे तपास पथकाचे म्हणणे आहे, त्याला अद्याप अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. ‘बोईंग ७३७-५००’ श्रेणीतील हे ‘एस.जे १८२’ क्रमांकाचे विमान उड्डाणानंतर काही वेळेतच रडारवरून गायब झाले. नियंत्रण कक्षाशी असलेला या विमानाचा संपर्क तुटला तेव्हा ते आकाशामध्ये दहा हजार फूट उंचीवर होते.

विमानातील प्रवाशांचा मृत्यू झाल्याच्या चर्चेला अद्याप इंडोनेशियाच्या अधिकाऱ्यांकडून स्पष्ट दुजोरा मिळालेला नाही. तरी, समुद्रात विमानाचे काही भाग मिळाले आहेत. तसेच मानवी अवयव व विमानातील इतर वस्तूही मिळाल्या आहेत. इंडोनेशियाचे अधिकारी पुढील तपास करत आहेत. मिळालेल्या पुराव्यांवरून विमानातील सर्वांचा मृत्यू झाल्याची भिती व्यक्त करण्यात येत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Island: मांडवीच्या गळ्यातील 'ते' 8 हिरे! परकीय राजवटींनी तोडली मंदिरे, पण संस्कृती बुडवू शकले नाहीत; वाचा गोव्याचा अद्भूत इतिहास

Harshan Yog June 2026: लव्ह लाईफमध्ये प्रेमाचा गुलमोहर बहरणार! 'हर्षण योग' ठरणार 5 राशींसाठी वरदान; धावपळीच्या आयुष्यातून मिळणार सुखाचा विसावा

Viral Video: वय वाढलं पण समजूतदारपणा कुठे गेला? चालत्या लोकलमध्ये आंटीचा हायव्होल्टेज स्टंट; व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांचा संताप

Vaibhav Sooryavanshi: 15 वर्षांचा वैभव रचणार इतिहास! क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकरचा मोडणार रेकॉर्ड, भारताचा बनणार नवा 'युवातारा'

Goa Irrigation: तिलारी कालवा कोरडा! शेतकरी चिंतेत; मिरची, भाजीपाला व हिरवा चारा करपण्याची भीती,पाणीपुरवठ्याची मागणी

SCROLL FOR NEXT