Wagah Border Dainik Gomantak
ग्लोबल

Pakistan Economic Crisis: वाघा बॉर्डरवरही पाकिस्तानच्या दिवाळखोरीचा परिणाम, पाक रेंजर्स...

Pakistan: दरम्यान, पाकिस्तानच्या कंगालीचा परिणाम भारतासोबतच्या प्रसिद्ध वाघा सीमेवरही दिसून येत आहे.

Manish Jadhav

Pakistan Economic Crisis: पाकिस्तान कर्जात बुडाला आहे. तो कटोरा घेऊन जगभर पैसे मागतोय. दरम्यान, पाकिस्तानच्या कंगालीचा परिणाम भारतासोबतच्या प्रसिद्ध वाघा सीमेवरही दिसून येत आहे.

वाघा-अटारी सीमेवर पाकिस्तानी रेंजर्सनीही भारताच्या बीएसएफच्या देखरेखीखाली परेड सुरु केली. मात्र तिथे पाकिस्तानी लोकांची उपस्थिती कमी असल्याने तिथे तैनात असलेल्या पाक रेंजर्सचाही उत्साह कमी दिसत आहे.

किंबहुना, गगनाला भिडणारी महागाई (Inflation) आणि तालिबानी दहशतवादामुळे पाकिस्तानातील नागरिक इतके घाबरले आहेत की, त्यांना आता वाघा बॉर्डरवर येण्यात रस वाटत नाही. कारण त्यांना पाकिस्तानी सैन्याचे शौर्य दाखवण्यात कमी आणि रोजची भाकरी कमावण्यात जास्त रस आहे.

कोरोना विषाणूच्या साथीमुळे संपूर्ण जग ठप्प झाले आहे, परंतु जग पूर्वपदावर येत असतानाही वाघा सीमेवर पाकिस्तानच्या बाजूने तोच उत्साह दिसत नाही.

महागाई आणि सुरक्षेमुळे पाकिस्तानी येत नाहीत

देशातील वाढती महागाई हे त्यामागचे प्रमुख कारण असल्याचे पाकिस्तानी विश्लेषकांचे मत आहे. तरुण पिढीला आता पाक रेंजर्सच्या परेडमध्ये रस नाही, असेही त्यांचे मत आहे. वाघा-अटारी सीमा भारत-पाकिस्तान सीमेवर आहे.

पाकिस्तानच्या बाजूने वाघा आणि भारताच्या बाजूचा परिसर अटारी म्हणून ओळखला जातो. या सीमेवर दररोज ध्वजारोहण समारंभ आयोजित केला जातो. यामध्ये पाकिस्तानचे रेंजर्स आणि भारताकडून (India) बीएसएफचे जवान सहभागी होतात.

पाकिस्तानने 10 हजार क्षमतेचे स्टेडियम बांधले, फक्त 1500 प्रेक्षक येत आहेत

हा सोहळा पाहण्यासाठी दोन्ही देशांनी सीमेला लागून असलेल्या परिसरात भव्य स्टेडियमही उभारले आहे. हा ध्वजवंदन सोहळा पाहण्यासाठी दोन्ही देशातील हजारो लोक दररोज येतात. पाकिस्तानने बांधलेल्या या स्टेडियममध्ये 10,000 प्रेक्षक बसू शकतील.

मात्र, अलीकडच्या काळात केवळ 1500 ते 2000 लोक पोहोचत आहेत. त्यांची संख्या फक्त रविवारीच 3000 च्या जवळपास पोहोचते. कामाच्या दिवसात कमी लोकांची संख्या पाकिस्तानी रेंजर्सच्या मनोबलावर परिणाम करत आहे.

अटारी येथे भारताच्या दिशेने गर्दी जमली

भारताच्या बाजूने असलेल्या स्टेडियमची आसनक्षमता 25,000 प्रेक्षकांची आहे. दररोज हजारो लोक भारताच्या बाजूने अटारीला पोहोचतात आणि बीएसएफला प्रोत्साहन देतात. रिकाम्या स्टेडियमचा त्यांच्या उत्साहावर परिणाम होतो, असेही पाकिस्तानी प्रेक्षकांचे मत आहे.

जवळपास उपस्थित असलेल्या दुकानदारांनीही पाकिस्तानी लोकांच्या घटत्या संख्येबद्दल दु:ख व्यक्त केले. कारण त्यांची विक्रीही कमी झाली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

T20 World Cup 2026 Schedule: क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! T20 वर्ल्ड कप 2026चे वेळापत्रक जाहीर; भारत-पाकिस्तान महामुकाबला कधी?

Goa ZP Election 2025: जिल्हा पंचायत निवडणुकीसाठी 'आप-आरजीपी' युतीचे संकेत; मनोज परब म्हणाले, 'सर्व पर्याय खुले'!

T20 World Cup 2026: रोहित शर्मा बनला टी20 वर्ल्ड कप 2026 चा 'ब्रँड ॲम्बेसेडर'; जय शहांची मोठी घोषणा!

Navpancham Yog 2025: डिसेंबर महिन्यात 'या' 3 राशींच्या लोकांचे होणार बल्ले-बल्ले, नवपंचम योग ठरणार वरदान; धनलाभासह करिअरमध्ये सकारात्मक बदलाची चिन्हे!

Goa Politics: 'नोकरी घोटाळ्यातील एजंट भाजपचे', विजय सरदेसाईंचा मोठा गौप्यस्फोट; ढवळीकरांविरोधात षड्यंत्राचा आरोप

SCROLL FOR NEXT