China On India Maldives Conflict Dainik Gomantak
ग्लोबल

India-Maldives वादात चीनची उडी; ड्रॅगन म्हणातो, भारताने...

China On India Maldives Conflict: याआधी मालदीवचा कोणताही राष्ट्राध्यक्ष असो त्यांचा पहिला विदेश दौरा भारतात असायचा. भारतीय मीडियामध्ये यासंदर्भातील बातम्या आल्याने चीन चिडला आहे.

Ashutosh Masgaunde

China does not like other countries joining hands with India in the dispute with Maldives. Global Times wrote that India should think with an open mind:

मालदीवसोबतच्या वादात इतर देशांनी भारताशी हातमिळवणी करणे चीनला पसंत पडलेले नाही. चीनचे अधिकृत वृत्तपत्र ग्लोबल टाइम्सने लिहिले की, भारताने खुल्या मनाने विचार केला पाहिजे. आपला प्रभाव या प्रदेशात कायम राहावा, असे भारताचे मत आहे.

मालदीव आणि इतर शेजारी देशांनी त्याचे अनुकरण केले आणि चीनपासून दूर राहिले. दक्षिण आशियातील देशांमध्ये चीनकडे दुर्लक्ष करता येणार नाही, याचा भारताने विचार करायला हवा, असे ग्लोबल टाइम्सने म्हटले आहे.

वास्तविक, मालदीवचे अध्यक्ष मोहम्मद मुइज्जू सध्या चीनच्या दौऱ्यावर आहेत. याआधी मालदीवचा कोणताही राष्ट्राध्यक्ष असो त्यांचा पहिला विदेश दौरा भारतात असायचा. भारतीय मीडियामध्ये यासंदर्भातील बातम्या आल्याने चीन चिडला आहे.

ग्लोबल टाइम्सने विश्लेषकांच्या माध्यमातून म्हटले आहे की, मुइझ्झूच्या भेटीचे वर्णन चीन समर्थक म्हणून करणे हे काही भारतीय नेत्यांमधील आत्मविश्वासाची कमतरता दर्शवते. या क्षेत्रात चीनशी स्पर्धा करण्यासाठी भारताने आपल्या शेजारी देशांसोबतचे ताणले गेलेले संबंधाचे खापर चीनवर फोडू नये.

चीनमधील विस्तारवादी विचारसरणीच्या सिचुआन इंटरनॅशनल स्टडीज युनिव्हर्सिटीच्या स्कूल ऑफ इंटरनॅशनल रिलेशन्सचे प्राध्यापक लॉंग जिंगचुन म्हणतात की, चीन मालदीवच्या सार्वभौमत्वाचा आदर करतो आणि त्याच्या देशांतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप करत नाही. भारताप्रमाणे चीन इतर देशांच्या मालदीवशी असलेल्या संबंधांना विरोध करत नाही.

ग्लोबल टाइम्सच्या माध्यमातून चीनने सांगितले की, त्यांनी मालदीवला कधीही भारतापासून दूर राहण्यास सांगितले नाही. तसेच भारत आणि मालदीव यांच्यातील संबंधांना धोका म्हणून पाहत नाही.

ग्लोबल टाइम्सने पुढे लिहिले की, चीन भारत आणि मालदीवसोबत त्रिपक्षीय सहकार्य करण्यास इच्छुक आहे. भारताने खुल्या मनाने विचार केला पाहिजे. आपला प्रभाव या प्रदेशात कायम राहावा, असे भारताचे मत आहे. मालदीव आणि इतर शेजारी देशांनी त्याचे अनुकरण केले आणि चीनपासून दूर राहिले. दक्षिण आशियातील देशांमध्ये चीनकडे दुर्लक्ष करता येणार नाही, याचा भारताने विचार करायला हवा, असे ग्लोबल टाइम्सने म्हटले आहे.

फुदान युनिव्हर्सिटीच्या सेंटर फॉर साऊथ एशियन स्टडीजचे उपसंचालक लिन मिनवांग यांच्या हवाल्याने ग्लोबल टाईम्स लिहितो, मुइझू चीन आणि भारताची बाजू घेत नाही. त्यांना तसे करण्याचीही गरज नाही. किंबहुना ते आपल्या देशाच्या हिताला प्राधान्य देत आहे. मुइझ्झू यांना चीन समर्थक धोरणाचा बोगीमन बनवून भारत त्याच्यावर दबाव आणू इच्छितो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs NZ: 'किंग' कोहलीची ऐतिहासिक 'विराट' ओव्हरटेकिंग; मैदानात पाऊल ठेवताच मोडला सौरभ गांगुलीचा मोठा रेकॉर्ड

"आम्ही आणि पाकिस्तानी सैन्य एकच!" लष्कर-ए-तैयबाच्या दहशतवादी सैफुल्लाह कसूरीची मोठी कबुली; भारताविरुद्ध पुन्हा ओकली गरळ

"...म्हणून गोवा बर्बाद" राज ठाकरेंनी मांडलं जमिनींच्या लुटीचं 'डिजिटल' गणित; महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत रील्सस्टार्सना लगावला टोला

Goa Tourism: गोव्याचा पर्यटनात जागतिक डंका! 2025 मध्ये 1 कोटी 8 लाख पर्यटकांनी दिली भेट

IND vs NZ: ऋषभ पंतच्या जागी 'या' युवा खेळाडूची संघात एन्ट्री, 'BCCI'ने केली घोषणा

SCROLL FOR NEXT