Melanie Joly|India-Canada Row Dainik Gomantak
ग्लोबल

India-Canada: भारताच्या दणक्यानंतर कॅनडा वठणीवर, ट्रूडो सरकारच्या मंत्र्याने दाखवली चर्चेची तयारी

Ashutosh Masgaunde

Canadian Foreign Minister Melanie Joly has expressed her desire for personal talks with India to resolve the dispute:

खलिस्तानी दहशतवादी हरदीप सिंह निज्जरच्या हत्येवरून भारत आणि कॅनडा यांच्यातील वाद वाढत चालला आहे. कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी निज्जर यांच्या हत्येमागे भारताचा हात असल्याचा आरोप केला होता.

यानंतर दोन्ही देशांमधील संबंध सातत्याने बिघडत आहेत. दरम्यान, कॅनडाच्या परराष्ट्र मंत्री मेलानी जोली यांनी हा वाद सोडवण्यासाठी भारतासोबत वैयक्तिक चर्चेची इच्छा व्यक्त केली आहे.

भारताने नुकतेच कॅनडाचे भारतात (India-Canada Row) असेलेल्या 41 राजनैतिक अधिकाऱ्यांना 10 ऑक्टोबरपर्यंत देश सोडण्याचे आदेश दिले आहे. भारताच्या या झटक्यानंतर कॅनडाने नरमाईची भूमिका घेतली आहे.

खलिस्तानी दहशतवादी हरदीपसिंग निज्जर याच्या हत्येवरून निर्माण झालेला वाद सोडवण्यासाठी कॅनडाला भारतासोबत (India-Canada Row) वैयक्तिक चर्चा करायची आहे, असे जोली यांनी सांगितले.

त्या म्हणाल्या, 'आम्ही भारत सरकारच्या संपर्कात आहोत. आम्ही कॅनडाच्या मुत्सद्दींच्या सुरक्षेला गांभीर्याने घेतो. आम्ही त्याच्याशी वैयक्तिकरित्या संपर्क कायम ठेवू कारण आमचा विश्वास आहे की जेव्हा ते वैयक्तिक असतात तेव्हा राजनैतिक वाटाघाटी सर्वोत्तम कार्य करतात.

खलिस्तानी दहशतवादी हरदीप सिंह निज्जरच्या हत्येवरून दोन्ही देशांमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून तणाव आहे. निज्जरच्या हत्येत भारताचा सहभाग असल्याचा आरोप कॅनडाच्या पंतप्रधानांनी केला होता.

यानंतर भारताने हे आरोप फेटाळून लावले आणि त्यांना बेताल आणि राजकीय हेतूने प्रेरित म्हटले. यासोबतच दोन्ही देशांनी एका उच्चपदस्थ राजनयिकाची हकालपट्टी केली आहे. भारताने कॅनडाच्या नागरिकांसाठी व्हिसा सेवाही तात्पुरती स्थगित केली आहे.

हरदीपसिंग निज्जरच्या हत्येच्या दाव्याच्या समर्थनार्थ कॅनडाने (India-Canada Row) अद्याप कोणतेही सार्वजनिक पुरावे दिलेले नाहीत हे विशेष.

कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी मंगळवारी सांगितले होते की, त्यांचा देश भारतासोबतचा वाद वाढवू इच्छित नाही आणि जबाबदारीने आणि रचनात्मक संबंध ठेवू इच्छितो. कॅनेडियन कुटुंबांना मदत करण्यासाठी आम्हाला भारतात उपस्थिती हवी आहे, असे ट्रूडो म्हणाले होते.

भारताने कॅनडा (India-Canada Row) सरकारला 10 ऑक्टोबरपर्यंत आपल्या 41 राजनयिकांना परत बोलावण्यास सांगितले असताना ट्रूडोचे हे विधान समोर आले आहे. 10 ऑक्टोबरनंतरही हे राजनयिक भारतात राहिल्यास त्यांची राजनैतिक प्रतिकारशक्तीही रद्द केली जाईल, असे भारताने स्पष्टपणे सांगितले आहे.

येथे भारत सरकारच्या सूत्रांनी देखील स्पष्ट केले आहे की, कॅनडाने निज्जरच्या हत्येमध्ये कोणत्याही भारतीय एजंटच्या सहभागाबद्दल कोणतेही विशिष्ट पुरावे दिलेले नाहीत. दुसरीकडे अमेरिकेच्या राज्य विभागाने नुकतेच पुन्हा एकदा भारताला कॅनडाच्या (India-Canada Row) तपासात सहकार्य करण्याचे आवाहन केले होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Bhandari Community In Goa: निवडणुकीची घोषणा होणार? भंडारी समाजाच्या आमसभेकडे सगळ्यांचे लक्ष

Mhadei Water Dispute: 'म्हादई'बाबत चुकीची माहिती नको! नेरसे येथे जलवाहिनीचे काम सुरु नाही

Goa Forward: नोकरभरतीसंदर्भात 'सात दिवसांत' योग्य निर्णय घ्या; गोवा फॉरवर्डची मागणी

Subhash Velingkar: आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या वेलिंगकरांच्या अटकेसाठी गोवा पोलिसांची महाराष्ट्रात शोध मोहीम!

खरी कुजबुज: जीत - मायकल आमने सामने

SCROLL FOR NEXT