Syrup
Syrup  Dainik Gomantak
ग्लोबल

Uzbekistan: गाम्बियानंतर उझबेकिस्तानमध्ये कफ सिरप प्यायल्याने 18 मुलांचा मृत्यू!

दैनिक गोमन्तक

Uzbekistan News: कफ सिरप प्यायल्याने गाम्बियामध्ये 66 मुलांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली होती. यातच आता, उझबेकिस्तानच्या आरोग्य मंत्रालयाने आरोप केला आहे की, भारतीय औषध कंपनीने बनवलेल्या औषधाचे सेवन केल्याने देशात 18 मुलांचा मृत्यू झाला आहे. मंत्रालयाने म्हटले की, मेरियन बायोटेक प्रायव्हेट लिमिटेडची नोंदणी उझबेकिस्तानमध्ये 2012 मध्ये झाली होती.

उझबेकिस्तानच्या (Uzbekistan) आरोग्य मंत्रालयाने एका निवेदनात म्हटले आहे की, मृत्यू झालेल्या मुलांनी नोएडास्थित मेरियन बायोटेकने निर्मित डॉक-1 मॅक्स सिरपचे सेवन केले होते. डॉक-1 मॅक्स सिरप घेतल्याने श्वासोच्छवासाचा गंभीर आजार असलेल्या 21 पैकी 18 मुलांचा मृत्यू झाला आहे. मंत्रालयाने पुढे म्हटले की, असे आढळून आले आहे की, मरण पावलेल्या मुलांना रुग्णालयात (Hospital) दाखल करण्यापूर्वी 2-7 दिवस हे औषध 3-4 वेळा देण्यात आले होते. यासोबतच कंपनीने औषधासाठी ठरवलेली मानके निर्धारित प्रमाणापेक्षा जास्त आहेत.

इंडिया टुडेच्या अहवालानुसार, आरोग्य मंत्रालयाने आपल्या निवेदनात असेही म्हटले आहे की, औषधाचा मुख्य घटक पॅरासिटामॉल असल्याने, मुलांच्या पालकांनी ते स्वतःहून किंवा फार्मसी विक्रेत्यांच्या शिफारसीनुसार चुकीच्या पद्धतीने सर्दी-विरोधी म्हणून लिहून दिले आहे. परिस्थिती बिघडण्याचे हेच मुख्य कारण आहे.

दुसरीकडे, आरोग्य मंत्रालयाने असा दावा केला आहे की, सिरपच्या प्राथमिक चाचण्यांमध्ये असे आढळून आले आहे की, त्यात इथिलीन ग्लायकॉल आहे, जे एक विषारी द्रव्य आहे. यामुळे उलट्या होणे, बेशुद्ध होणे, हृदयाच्या समस्या आणि मूत्रपिंड निकामी होणे यासारख्या गंभीर समस्यांना तोंड द्यावे लागते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Kanguva: 'कंगुवा'चा टीझर घालतोय धूमाकूळ; गोव्यासह ‘या’ खास ठिकाणी झालं बीग बजेट चित्रपटाचं शूटिंग

Goa Congress: सार्दिन घरात बसून विरियातोंचा प्रचार करतात; पाटकरांनी टोचले MP फ्रान्सिस यांचे कान

Prajwal Revanna: आम्ही व्हिसा दिला नाही… प्रज्वल रेवन्ना जर्मनीला पळून गेल्याच्या प्रश्नावर परराष्ट्र मंत्रालयाची प्रतिक्रिया

Shashi Tharoor In Goa: भाजपला धक्का बसणार, 400 नव्हे 200 पार करने देखील जड जाणार - थरुर

Goa Police : २४ वर्षांपासून अजूनही ‘ते’ न्यायाच्या प्रतिक्षेत; बडतर्फ पोलिसाची व्यथा

SCROLL FOR NEXT