Yogi Adityanath Dainik Gomantak
देश

3 महिने मोफत रेशन, यूपीच्या 15 कोटी जनतेला योगी सरकारची पहिली भेट

योगी सरकारच्या या निर्णयामुळे थेट 15 कोटी लोकांचे बदलणार जीवन

दैनिक गोमन्तक

लखनऊ: उत्तर प्रदेशमधील (UP) योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) सरकारच्या पहिल्या कॅबिनेट बैठकीत राज्यातील 15 कोटी जनतेला आनंदाची बातमी देण्यात आली आहे. या बैठकीत पुढील 3 महिने मोफत रेशन योजना सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर खुद्द मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या योजनेची घोषणा केली.

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी त्यांच्या पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीनंतर पत्रकार परिषदेत सांगितले की, 'आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत आम्ही मोफत रेशन योजनेला आणखी तीन महिने वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. याचा फायदा राज्यातील 15 कोटी लोकांना होणार आहे. ही योजना कोरोना महामारीच्या काळात सुरू करण्यात आली होती.

त्याचवेळी मंत्रिमंडळ बैठकीनंतर दोन्ही उपमुख्यमंत्री एकत्र आले. उपमुख्यमंत्री केशव मौर्य म्हणाले की, या निर्णयामुळे थेट 15 कोटी लोकांचे जीवन बदलेल. त्याचवेळी ब्रिजेश पाठक म्हणाले की, सरकार सातत्याने गरिबांची काळजी घेत असून त्याचा थेट लाभ करोडो कुटुंबांना मिळणार आहे.

कॅबिनेट बैठकीपूर्वी उत्तर प्रदेशचे राज्यमंत्री संदीप सिंह म्हणाले होते की, आज योगी 2.0 ची पहिली कॅबिनेट बैठक घेणार आहे आणि आजच्या बैठकीत काही महत्त्वपूर्ण निर्णय होण्याची शक्यता आहे आणि विभागांच्या वितरणावरही चर्चा होऊ शकते.

शुक्रवारी योगी आदित्यनाथ यांनी एकना स्टेडियमवर पुन्हा उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. या शपथविधी सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदींसह सर्व बडे नेते उपस्थित होते. योगी मंत्रिमंडळात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसह 53 दिग्गज नेते आहेत. उत्तर प्रदेशच्या राजकारणातील अनेक समज मोडीत काढत योगी आदित्यनाथ यांनी सलग दुसऱ्यांदा उत्तर प्रदेशची कमान हाती घेतली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Highway: जमिनी गेल्या, रस्ताही अडला; उगवेकरांचा संताप, एनएच 66 मुळे दैनंदिन जीवन विस्कळीत; मोबदल्याची अद्याप प्रतीक्षा

Bicholim Hit And Run Case: सुरक्षेचा 'तिसरा डोळा' ठरला कर्दनकाळ; अपघातानंतर पळणाऱ्या चालकाच्या मुसक्या आवळल्या, डिचोली पोलिसांची कारवाई

"वाघांचे मृत्यू अन् वन विभागाचे अपयश"; पर्यावरणप्रेमी राजेंद्र केरकर यांचा थेट प्रहार!

Goa Crime: काकाची हत्या करून मावशीकडे घेतला आश्रय! बोरी येथील दीपक नाईक हत्या प्रकरणातील संशयित नराधम पोलिसांच्या तावडीत

Goa Accident: अटल सेतूवर विचित्र अपघात! 1 नाही, 2 नाही... 7 गाड्या एकमेकांना धडकल्या, वाहतूक विस्कळीत; Watch Video

SCROLL FOR NEXT